पुणे- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने च काय सर्वांनींच वागावे ..यात दुमत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले नाही कि मी आदेश देईपर्यंत प्रत्येक बेकायदा गोष्ट .. तशीच राहू द्यात .. पुण्यातील रस्त्याला ,वाहतुकीला अडथळा ठरणारी अनेक गणेश मंडळाच्या ‘मूर्ती ‘ ठेवलेली ‘मंदिरे ‘ भल्या रात्री , लोक साखर झोपेत असताना .. दरोडा टाकावा त्याप्रमाणे ..महापालिकेने पाडली …. बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी..हरकत नाही ..आणि त्याला कायदा सुव्यवस्था ..राखावी म्हणून .. लोकांना समजू न देता .. ती अंधारात गुपचूप पाडली, ठीक आहे ..दिवसा अशा कारवाया करण्यास सहसा पोलीस धजावत नाहीत ,लोकांच्या धार्मिक भावना लगेच उफाळून येतात .. आणि मग पोलिसांना त्रास होतो ..त्यांना कायदा सुव्यवस्था राखणे कठीण होते ..ठीक आहे ..
पण प्रश्न असा आहे ,याच पोलिसांना वाहतुकीचा अडथळा करणारी हॉटेल दिसत नाहीत काय ? याच महापालिकेला वाहतुकीला अडथळे निर्माण करणारे हॉटेल्स ,व्यावसायिक बांधकामे दिसत नाहीत काय ? शहर आणि परिसरात हजारी हॉटेल्स अशी आहेत ज्यांनी पार्किंगच्या जागा बळकावून हॉटेल्स सुरु ठेवली आहेत . तर कित्येकांना पार्किंगची सोय नसताना हॉटेल्स महापालिकेने बिनधास्त उभारा म्हणून जणू सांगितले असावे . रस्त्याच्या कडेला ,कॉर्नरला , फ्रंट आणि साईड मार्जिन मध्ये किंवा चक्क रस्त्यावर फुटपाथवर किती हॉटेल्स चालतात .. त्यांनी वाहतुकीला अडथला होत नाही काय ? वाहतुकीची आणि लोकांच्या जीवन मरणाची काळजी घेणाऱ्या पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्ती चा फतवा राबविण्याचा निर्धार केला आहे . हा निर्धार करताना ,किंवा तो राबविण्यापूर्वी ..आयुक्त साहेब, महापौर साहेब , तुमची इच्छया नाही काय … अशी सर्व हॉटेल्स पाडून जागा मोकळ्या करून त्या पार्किंगला मुक्त करण्याची …
किती गणेश मंडळांनी आपापल्या मुर्त्या .. अशा रस्त्यावर, किंवा कडेला, किंवा साईड मार्जिन मध्ये बेकायदा बांधकामे करून ठेवल्यात ..? आणि किती हॉटेल्स अशी आहेत / याचा सर्वे आयुक्त साहेब तुम्ही केलाय काय ?
शिवाजीराव पवार नावाचे नगर अभियंता होऊन गेले. तेव्हा आम्ही ..अशा बेकायदा हॉटेल्सच्या सर्वेची यादी मागितली होती .. आणि त्यांना सहायक नगर अभियंता म्हणून काम करणाऱ्या हरिहर यांनी आम्हाला ती दिली होती तेव्हा .. त्या यादीत कलमाडींच्या तत्कालीन पुना कॉफी हाऊस, रामकृष्ण मोरेंच्या टिळक रस्त्यावरील ,आणि ढोले पाटलांच्या कपिला हॉटेल सह, थिटे यांच्या मार्केट यार्डातील हॉटेल सह सुमारे ४०० हॉटेलांचा समावेश होता… आज काय स्थिती आहे .. हि सारी हॉटेल्स आज त्या स्थितीत नसतील बडी नेते मंडळी नसतील .. पण बेकायदा बांधकामे केलेल्या हॉटेल्स ची संख्या किती असेल ? आणि त्यामुळे पुण्यातील ,पार्किंगला ,वाहतुकीला किती अडथळा होत असेल .. याचा सर्वे गेल्या 25 वर्षात कोणी केलाय काय ? …
असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा .. तुमच्याकडून होणाऱ्या कारवायांबाबत ..शंका निर्माण होतात . तुमच्या कारवाया राजकीय तर नाहीत … अशी शंका डोकावल्या शिवाय राहत नाही .पेट्रोल डीझेल दरवाढ ,जीएसटी,हेल्मेट सक्ती,पिण्याचे पाणी मीटर लाऊन विकत देण्याचा घाट , वाहतुकीची कोंडी , बेरोजगारी ,कंत्राटी कामगारांची छळणूक अशा विविध कारणांनी जनतेचा रोष तर तुम्ही अंगावर घेत आलाच आहात ,आता निवडणुकीत तुम्हाला उपयोगी ठरणारी असंख्य गणपती मंडळांचाही तुम्ही रोष पत्करत आहात … आम्ही तर एवढेच म्हणू ..हे गणराजा.. एखाद्या सातारा रोडवरील मठाचे बांधकाम वाचविण्यासाठी कोट्यांवाधींचा उड्डाणपूल जे उभारतील …बुधवार पेठेतील भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेले मंदिर अडथळा ठरले तरी त्याकडे दुर्लक्ष करतील ..पण छोट्या छोट्या मंडळांच्या ..म्हणजे कमजोर व्यक्तींवरच कारवाया करतील .. अशा स्वरूपाची वृत्ती सोडून … या सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वत्र ..सारख्या पद्धतीने कायदा राबविण्याची शक्ती मिळो… .पहा आता तूच पावलास आणि तूच धावलास तर ..यांना सद्बुद्धी मिळेल …निव्वळ बेकायदा बांधकामे करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाया केल्या तरी वाहतुकीचा कोंडलेला श्वास बराचसा मोकळा होईल …बाकी सारे… तुझ्या हातही नाही गणराज ,सारे काही ..या बड्या कायदा रक्षकांच्या हाती …..