पुणे, ता. २९ ः पुरस्कारामुळे जबाबदारी वाढते आणि अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते असे मत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.
श्री आदिशक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विद्यमान (ओळख पुण्याची) आणि भावी विद्यमान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. पाटील मार्गदर्शन करीत होते.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, ‘समाजात चांगले काम करणार्या व्यक्तींना पुरस्कार दिल्याने चांगल्या गुणांचा गुणगौरव होतो. समाजात आपला ठसा उमटवू इच्छिणार्या नवोदितांना काम करण्यांना काम करण्याची दिशा मिळते.’
डॉ. डी. वाय. पाटील, उद्योजक अरुण फीरोदिया, चित्रकार रवी परांजपे, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित, सराङ्ग हरी शंकर नगरकर, पंडित वसंतराव गाडगीळ, शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक, अभिनेत्री लीला गांधी, पुरातत्त्व तज्ज्ञ डॉ. गो. ब. देगलुरकर, जाहिरात क्षेत्रातील डॉ. दीनकर शिलेदार यांना ‘आदिबंध’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आदिबंध २०१९ या विशेषअंकाचे प्रकाशन करण्यात आले
उद्योजक शंकर बडवे, अशोक चाफेकर, अपर्णा जोशी, डॉ. योगेश चांदोरकर, डॉ. पुष्पराज करमरकर, सागर व मंदार कौशिक, उमेश व योगेश भाटे, नितीन भागवत, जब्बार शेख. काशिनाथ जाधव, महेंद्र व अनिल पाटील, दत्तात्रय काळे यांचा भावी विद्यमान पुणेकर म्हणून सन्मानित करण्यात आले.
आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंदार बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश शिंदे, संदीप शेळके, ऍड सतीश कांबळे, ऍड यशवंत खंडागळे, किशोर सरपोतदार, अजित कुमठेकर, गिरीश परांजपे, शैलेश सावळेकर, गोविंद हर्डीकर, आर. टी. कुलकर्णी, विकास पाटील, संतोष भरते, अजित भाकरे, जयदीप कुटे यांनी संयोजन केले.