‘कैलास’ने अनुभवला दीवाळीचा लखलखाट
पुणे-शेवटचा निरोप देण्यासाठी जमलेले शोकाकुल आप्तस्वकीय, अंत्यसंस्काराची लगबग, चितेला अग्नी देताच आसमंतात घुमणारे हुंदके आणि अतीव दुःखाने टाहो ङ्गोडणारे जीवलग….कुठल्याही स्मशानभूमीत वर्षभर हेच वातावरण असते
पण आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी कैलास स्मशानभूमीने दीवाळीचा लखलखाट अनुभवला. सनईचे सूर, रांगोळीच्या पायघड्या, सेवकांसाठी मिठाई, भेटवस्तूंची रेलचेल आणि दीव्यांच्या प्रकाशात ल‘ख उजळून निघालेला आसमंत
राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाच्या वतीने या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेविका लता राजगुरु, क्षेत्रिय अधिकारी अरुण खिलारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वच्छतेचे काम तेही स्मशानभूमीतील असेल, तर या कर्मचार्यांच्या पदरी नेहमीच उपेक्षा येते. परंतु समाजातील या वंचित घटकाची दिवाळीनिमित्त आठवण ठेवून, त्यांच्या सोबत दिवाळी साजरा करण्याचा उपक‘म स्तुत्य असल्याचे मत आमदार मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केले.
मंदार रांजेकर, प्रतिक अथने, अभिषेक पवार, गौरव निवलकर, देवयानी शेलार, शुभम बिचकुले, सुप्रिया मुरमुरे, रोमा लांडे, मुकेश खामकर, अक्षय माने यांनी संयोजन केले. उपक‘माचे हे आठवे वर्ष होते.