इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी केला आहे .
या संदर्भात त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने धार्मिक उत्पात निर्माण करण्यासाठी देशातील शहरांची नावे बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडवण्याचा सरकारचा हेतू आहे. देशात निर्माण झालेली ही नामांतराची लाट जर चांगल्या कारणांसाठी असती, प्रगतीसाठी, विकासाठी असती तर आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकलो असतो. खरे तर लोकांची मागणी असताना एखाद्या शहराचे नाव बदलणे हा भाग वेगळा, पण इथ उलटंच होत आहे. सरकार धार्मिक आणि राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन शहरांची नावे बदलत असल्याचा आरोप सोनवणी यांनी केला.
पुणे शहराचे नाव जिजापूर करून संभाडी ब्रिगेडला काय फायदा होणार यावर संजय सोनवणी म्हणाले, संभाजी ब्रिगेडसुध्दा आता राजकारणात उतरली आहे. त्यांच्या प्रकाशनात मागील अनेक वर्षांपासून पुणे शहराचे नाव जिजाऊनगर किंवा जिजापूर असेच छापत आले आहेत. अशात त्यांना ही राजकीय फायदा मिळवण्याची संधी वाटली. ही संधी खुद्द सरकारनेच त्यांना दिली. संभाजी ब्रिगेडचा आतापर्यंतचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. त्यांनी आजवर सामाजिक सलोख्याच काम केलेलं आढळत नाही. अशा परिस्थितीत संभाजी ब्रिगेडने जी काही मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमागे केवळ राजकिय हेतू नाही तर त्यामागे सामाजिक तेढ निर्माण करण्याचे उद्दीष्ट तर नाही ना, अशी शंका येणे स्वाभाविक आहे.