‘यशस्वी’ संस्थेच्या शौर्य चक्र विजेत्यांशी थेट संवाद*
पुणे : संकटांना घाबरून न जाता धैर्याने त्याला सुमारे जाणे यातच खरे शौर्य असते, असे मत शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने मकर संक्रातीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘वुई सॅल्यूट रिअल हिरोज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सीमेवर देशरक्षणासाठी लढत असताना शत्रूच्या रूपात स्वतःचा मृत्यू समोर असताना देखील भारतीय सैनिक आपल्या कर्तव्यापासून तसूभरसुद्धा ढळत नाही, उलट त्या क्षणी त्याच्यात जास्त प्रमाणात बळ संचारते आणि प्रसंगी प्राणांची आहुती देऊनही आपले देश रक्षणाचे कार्य सैनिक करत असतो,विद्यार्थी मित्रांनो अगदी त्याचप्रमाणे शिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही आपल्या नोकरी व्यवसायात एखाद्या संकटाला सामोरे जाल तेव्हा तुमचा सामोर भारतीय सैन्याचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शौर्य दाखवा, शुरपणा अंगी बाणवा तरच तुम्ही तुमच्यातील उत्तम जगाला देऊ शकाल. यावेळी त्यांनी मणिपूर येथील ऑपरेशन इफाजत च्या वेळेस आंतकवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या प्रसंगाची आठवण सांगत आपल्या लष्करी जीवनातील विविध रोमहर्षक अनुभव सांगितले. त्यांचे हे अनुभव ऐकून विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले. यावेळी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ.मिलिंद मराठे, ‘यशस्वी’संस्थेचेअधिष्ठाताडॉ.राजेंद्र सबनीस, राष्ट्रीय सैनिक प्रांताध्यक्ष प्रताप भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.