जोशी हे काँग्रेसचे १९७२ पासूनचे निष्ठावान कार्यकर्ते असून, पुण्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थांशी ते संबंधित आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. १९६८ मध्ये स्थानिक मराठी दैनिकात बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९७२-७३ च्या काळात राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. शहराध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षातर्फे विविध कार्यक्रम राबविले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुण्यातील सर्व निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आणि महापालिकेतही पूर्ण सत्ता काँग्रेसला मिळाली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीत जोशी यांचा समावेश होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये त्यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वळण देणारा प्रसंग ठरला. जोशी यांनी ‘तहलका’ प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांना विमानतळावर घेराव घालून दोन तास अडवून ठेवले होते. या आंदोलनानंतर त्यांचे नाव राज्यभरात झाले; तसेच जोशी यांनी राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथील निवडणुकांमध्ये पक्षाच्या वतीने काम केले आहे.
काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी
पुणे- अखेरपर्यंत उत्सुकता ताणत काँग्रेस पक्षाने माजी आमदार मोहन जोशी यांना पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री गिरीश बापट आणि जोशी यांच्यात सामना रंगणार आहे. जोशी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने निष्ठावंत गटाला न्याय दिल्याचे बोलले जात आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची झाकली मूठ काँग्रेसने अखेरपर्यंत कायम का ठेवली, हे मात्र कोडे अनेकांना उलगडू शकले नाही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुणे सोडून राज्यातील सर्व ठिकाणची उमेदवारी जाहीर केले होते. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि शेतकरी कामगार पक्षातून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड; तसेच अभय छाजेड यांचीही नावे चर्चेत होती. उमेदवार जाहीर होत नसल्याने शहरातील काँग्रेसजन व आघाडीतील मित्रपक्षाच्या वतीने उमेदवाराविनाच प्रचार सुरू करण्यात आला होता. अखेर सोमवारी रात्री उशिरा जोशी यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली. जोशी हे काँग्रेसचे निष्ठावंत असून, युवक काँग्रेसपासून ते पक्षात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याबरोबरच ते विधान परिषदेवर आमदारही होते. यापूर्वी १९९९ मध्ये जोशी यांनी भाजपचे प्रदीप रावत यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी तिरंगी लढतीमध्ये रावत निवडून आले, तर जोशी यांना दुसऱ्या क्रमांकाची सव्वादोन लाख मते मिळाली होती. ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार विठ्ठल तुपे यांना सुमारे दोन लाख मते मिळाली.
जोशी हे काँग्रेसचे १९७२ पासूनचे निष्ठावान कार्यकर्ते असून, पुण्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थांशी ते संबंधित आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. १९६८ मध्ये स्थानिक मराठी दैनिकात बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९७२-७३ च्या काळात राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. शहराध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षातर्फे विविध कार्यक्रम राबविले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुण्यातील सर्व निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आणि महापालिकेतही पूर्ण सत्ता काँग्रेसला मिळाली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीत जोशी यांचा समावेश होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये त्यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वळण देणारा प्रसंग ठरला. जोशी यांनी ‘तहलका’ प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांना विमानतळावर घेराव घालून दोन तास अडवून ठेवले होते. या आंदोलनानंतर त्यांचे नाव राज्यभरात झाले; तसेच जोशी यांनी राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथील निवडणुकांमध्ये पक्षाच्या वतीने काम केले आहे.
जोशी हे काँग्रेसचे १९७२ पासूनचे निष्ठावान कार्यकर्ते असून, पुण्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थांशी ते संबंधित आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. १९६८ मध्ये स्थानिक मराठी दैनिकात बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९७२-७३ च्या काळात राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. शहराध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षातर्फे विविध कार्यक्रम राबविले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुण्यातील सर्व निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आणि महापालिकेतही पूर्ण सत्ता काँग्रेसला मिळाली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीत जोशी यांचा समावेश होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये त्यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वळण देणारा प्रसंग ठरला. जोशी यांनी ‘तहलका’ प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांना विमानतळावर घेराव घालून दोन तास अडवून ठेवले होते. या आंदोलनानंतर त्यांचे नाव राज्यभरात झाले; तसेच जोशी यांनी राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथील निवडणुकांमध्ये पक्षाच्या वतीने काम केले आहे.