पुणे-पुणे लोकसभेच्या कॉंग्रेसच्या पारंपारिक जागेवर राष्ट्रवादी ने आग्रह धरल्यानंतर ,कॉंग्रेस राष्ट्रवादी ची आघाडी होऊनहीआणि शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण पुण्यातून लढणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावरही … पुण्याची जागा कोणाच्या पारड्यात पडणार ? उमेदवार आयात करणार काय ? असे सारे प्रश्न … आजही गुलदस्त्यातच उरल्याचेच स्पष्ट झाले आहे . मात्र भाजपला चीतपट करणारच उमेदवार इथे दिला पाहिजे असा आग्रह धरला जात असल्याचे हि स्पष्ट झाले आहे . आज येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर या बाबी स्पष्ट झाल्या .
केंद्र सरकारने नोटाबंदी घेतलेल्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाळे. आणि ‘तो’काळा दिन कॉंग्रेसे घोषित केला आहे.या निमित्ताने आज पुण्यात काँग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, कमल व्यवहारे,ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, आबा बागुल, नीता रजपूत, रशिद शेख, शिवाजी केदारी, सदानंद शेट्टी,गोपाळ तिवारी, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, अजित दरेकर, वैशाली मराठे, रफिक शेख,मनीष नंद, दत्ता बहिरट, शेखर कपोते, नरेंद्र व्यवहारे, सोनाली मारणे, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, सतिशपवार, प्रविण करपे, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, सुरेखा खंडागळे, द.स.पोळेकर, चेतन आगरवाल, बंडूनलावडे, बाळासाहेब अमराळे, रवि ननावरे, प्रकाश आरणे, दिपक ओव्हाळ, रामविलास माहेश्र्वरी, संजयखडसे, अविनाश अडसुळ, प्रशांत वेलणकर, राहुल तायडे, नदिम मुजावर, चैतन्य पुरंदरे, साहिल राऊत, देवीदासमगर, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, प्रशांत सुरसे, सुनिल पंडित, रवि पाटोळे, सेल्वराज ॲथोनी, बाबा शेख, प्रकाशपवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका देखील केली. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी बाबत त्यांनी भूमिका देखील मांडली.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरांच्या नाव बदलण्याच्या सरकारांच्या भूमिकेवर टीका केली आहे. विकासाच्या अजेंड्यावर सरकार सत्तेवर आलंय. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा वापर सुरू आहे. अशा प्रकारचे काम सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित आहे. पुण्याचं नाव बदलून इतिहास पुसण्याचे काम कोणीही करू नये. तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का?, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. आता पुण्याचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यांनी एवढे लक्षात ठेवावे की, इतिहास पुसण्याचे काम करू नये. तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का ? अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाण साधला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढणार का? मनसे ला बरोबर घेणार का या प्रश्नावर चव्हाण म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार असून जागा वाटपा बाबत सकारात्मक चर्चा देखील झाली असून पुढील बैठक मुंबई मध्ये या आठवड्यात होणार आहे. तसेच आम्ही एमआयएम आणि मनसे ला सोबत घेणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यास तयार असून त्यांच्यासाठी काही जागा सोडण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनीपुन्हा मांडली
तुम्ही पुण्यातून लोकसभेची जागा लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की, मी कराड दक्षिण मधून विधानसभा निवडणूक लढवणार पुण्यातून मी अजिबात इच्छुक नसून पुण्यातील लोकसभेची जागा कोण लढविणार हे ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.
अवनी वाघिणी मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकार वर सर्व स्तरातून लक्ष केले जात आहे. त्यावर ते म्हणाले,अवनी वाघिणी ला बेशुद्ध करण्याची आवश्यकता होती. मात्र या सरकारने तिचा फेक एनकाऊंटर केला. अशा शब्दात भाजप सरकार वर त्यांनी सडकून टीका केली.