पुणे- ..स्मार्ट पुण्याचं भूमिपूजन ,उद्घाटन यांनी केलं …पण स्मार्ट कोण झालं …? पुण्याचा बट्ट्याबोळ यांनी केला ..अशा स्थानिक प्रश्नांवर बोलत ‘ चाय वाले का ड्रामा अब 2 महिनेसे ज्यादा नही चलेगा’असा इशारा प्रदेशकॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे दिला .भवानीपेठेत त्यांची आज सायंकाळी जाहीर सभा झाली .सभेला नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती .कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील ,पुणे कॉग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे ,बाळासाहेब शिवरकर,नगरसेवक अविनाश बागवे ,आ.शरद रणपिसे ,मोहन जोशी ,अभय छाजेड,आबा बागुल, अरविंद शिंदे , मनीष आनंद ,कमल व्यवहारे ,अजित दरेकर ,उल्हास पवार ,रफिक शेख ,विठ्ठल थोरात शेखर कपोते ,राजेंद्र भुतडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
पुण्यातील हेल्मेट सक्ती वर यावेळी भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले , रस्त्यांची ,वाहतुकीची यांनी वाट लावली , मुबलक पाण्याचं नियोजन करता आलं नाही आणि हेल्मेट सक्ती लादली . यामुळे भाजपवाल्यांच्या डोक्यावर एवढी दगडं पडतील कि त्यांना हेल्मेट घालूनच बाहेर पाडाव लागेल अशी स्थिती येवू शकते . पुणे तिथे सारे उणे अशी स्थिती करून ठेवलेल्या भाजपने स्मार्ट पुण्याच्या प्रकल्पांच उद्घाटन केलं पण पुणेकरांच्या हाती काय आलं ? मोदींनी फसव्या घोषणा देवून सत्ता मिळविली त्यानंतर पेट्रोल डीझेल , गॅस चे दर त्यांनी कमी केले काय ? आता यांचा ड्रामा फार काळ चालणार नाही . त्यांच्या फायद्यासाठीच ते लोकसभा आणि विधानसभा एकत्रित घेतील .कॉंग्रेस पक्ष ..निवडणुका एकत्र व्होवो वा वेगळ्या व्होवो दोन्हीला तयार आहे . आणि जोपर्यंत हे सरकार पायउतार होत नाही तोपर्यंत कॉंग्रेसचा संघर्ष सुरूच राहील असे हि चव्हाण म्हणाले .