पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्याला कार्यक्रम स्थळापासून दूर नेले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली.
रेफ्याक्टरीतील जेवणाच्या दर्जाबाबात केलेल्या आंदोलनात विद्यार्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांने केली. मात्र, पोलिसांनी त्याला कार्यक्रम स्थळापासून दुर नेले. त्यामुळे परिसरामध्ये काही वेळेसाठी गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या विद्यार्थ्यास चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. मात्र, या प्रकरणामुळे आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे.