पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गीतबहार’ या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शुभांगी मुळे प्रस्तुत हा कार्यक्रम दि.१९ जुलै रोजी , शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे झाला. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात गण,गवळण,लावणी,लोकप्रिय हिंदी -मराठी गीत अशा एकाहून एक बहारदार रचना सादर करण्यात आल्या.
‘ दही दूध लोणी ‘ ,’ रात्र काळी, घागर काळी ‘ सारख्या गवळणी, ” झाला महार पंढरीनाथ ‘, ‘ कानडा राजा पंढरीचा ‘, ‘ वासुदेव ‘ सारखी भक्तीगीते ‘, ‘धुंदी कळ्यांना, ‘, घन ओथंबून येती ‘ , ‘ जीवलगा ‘ सारखी भावगीते रसिकांना मोहवून गेली.
‘ झुमका गिरा रे ‘, ‘ कजरा मोहब्बतवाला ‘, ‘ उडे जब , झुल्फे तेरी ‘, सारखी लोकप्रिय हिंदी गीते या कार्यक्रमात सादर झाली.
ही गीते शुभांगी मुळे , हेमंत वाळुंजकर यांनी गायली. केदार परांजपे,जयंत साने,मोहन पारसनीस,हेमंत पोटफोडे या कलाकारांनी साथसंगत केली. सौ मीरा ठकार कार्यक्रमाचे निवेदन केले.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ आयोजित हा ७९ वा विनामूल्य कार्यक्रम होता.