संशोधित इलेक्ट्रीक वाहने हेच उद्याचे भविष्य :डॉ . सागर व्यंकटेश्वरम
पुणे :‘इलेक्ट्रिक व्हेईकल लॅबोरेटरी ‘चे उदघाटन भारती विद्यापीठ ‘कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ मध्ये डॉ . सागर व्यंकटेश्वरम (मुख्य कार्यकारी अधिकारी ,ऑप्टिक्स टेल प्रा . लि . ) आणि रमा सुंदरम (मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रोपेलिक्स सोल्युशन्स ) यांच्या हस्ते झाले . कार्य्रक्रमाच्या अध्यक्षस्था नी ‘भारती विद्यापीठ’कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘चे प्राचार्य आनंद भालेराव होते .
डॉ.डी एस बनकर (विभागप्रमुख ,इलेक्ट्रिक इंजिनियरिंग ),प्राध्यापक वर्ग ,संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.हा कार्यक्रम भारती विद्यापीठ (कात्रज ) येथे झाला .
यावेळी बोलताना डॉ . सागर व्यंकटेश्वरम म्हणाले ,’भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढणार आहे . इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या सुपर कपॅसिटरच्या संशोधनाची गरज निर्माण होणार आहे . ही आव्हाने इलेक्ट्रिक इंजिनियजिंग विद्यार्थांनी पेलावी ‘
रमा सुंदरम म्हणाले ,’मागील वर्षी भारतात फक्त ५ हजार इलेक्ट्रिक वाहने विकली गेली . मात्र ,हा आकडा पुढे वाढणार आहे . त्यासाठी उपयुक्त संशोधन पुढे आले पाहिजे . ‘
डॉ आनंद भालेराव म्हणाले,’भारत सरकार इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन २०३० कडे पाहत आहे . त्यात गुंतवणूक होत आहे . सार्वजनिक वाहतूक आणि ओला -उबेर सारख्या टॅक्सी सेवा इलेकट्रीक होणार आहेत . अशावेळी इलेक्ट्रिक वाहनांचा वैयक्तिक वापर वाढला पाहिजे . या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीज ची कार्यक्षमता आणि आयुष्यमान वाढविण्यासाठी संशोधन करायला वाव आहे . विद्यार्थ्यांनी त्यात पुढाकार घ्यावा ‘