वर्ल्ड टुरिझम ‘ मध्ये कोकण महत्वाचं ठिकाण ठरेल :मुख्यमंत्री
पुणे : ‘ कोकणचे ब्रॅण्डिंग ,मार्केटिंग करण्यासाठी ‘ग्लोबल कोकण फेस्टिवल ‘च्या माध्यमातून होणाऱ्या सातत्यपूर्ण कामातून कोकणचा ‘ब्रँड ‘ तयार होत असून वृक्षराजी ,तळी ,आणि गोव्यापेक्षा चांगले सागर किनारे ‘ यामुळे ‘ वर्ल्ड टुरिझम ‘ मध्ये कोकण महत्वाचं ठिकाण ठरेल ‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .
७ व्या ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ चे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर ,लक्ष्मी लॉन ,मगरपट्टा सिटी ,हडपसर येथे तुळशी वृन्दावनाला पाणी घालून आणि प्रदर्शन दालनांची फीत कापून गुरुवारी सायंकाळी झाले . यावेळी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे ,खासदार अनिल शिरोळे ,आमदार विजय काळे ,योगेश टिळेकर ,जगदीश मुळीक ,विजय गोगावले ,किशोर धारिया उपस्थित होते . ६ वर्षे मुंबईत होणारा ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ यावर्षी प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे .
कोकण भूमी प्रतिष्ठान ‘ आणि ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘चे अध्यक्ष संजय यादवराव यांनी प्रास्ताविक केले . सहसंयोजक एम . क्यू . सय्यद यांनी स्वागत केले . कोकणातील यशस्वी उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
मुख्यमंत्री म्हणाले ,’यापूर्वीही मुंबईच्या ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘मध्ये मी सहभागी झालो होतो . यावर्षी पुण्यातही उपस्थित राहण्याचा योग आला . संपूर्ण कोकण या फेस्टिव्हल मध्ये पाहायला मिळते . कोकण भूमी प्रतिष्ठान ,ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ने सातत्यपूर्ण कामातून कोकणचे ब्रॅण्डिंग ,मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न केले, हे कौतुकास्पद आहे . त्यातून कोकणचा ‘ब्रँड ‘ तयार होत असून वृक्षराजी ,तळी ,आणि गोव्यापेक्षा चांगले सागर किनारे ‘ यामुळे ‘ वर्ल्ड टुरिझम ‘ साठी कोकण महत्वाचं ठिकाण ठरेल.
पर्यटन वृद्धीसाठी ५ गावे कोकण भूमी प्रतिष्ठानने निवडली असून तेथे होम स्टे ,टुरिझम वृद्धिंगत केले जाणार आहे ,हे महत्वाचे पाऊल आहे . सरकारही कोकण विकासासाठी प्रयत्न करीत असून चिपी विमानतळ ,रत्नागिरी विमानतळ ,दिघी बंदर आणि चौपदरीकरण होत असलेला मुंबई -गोवा महामार्ग यामुळे कोकण ची कनेक्टिव्हीटी वाढणार असून ४ तासात कोकणात पोहोचणे शक्य होणार असल्याने पर्यटक कोकणात येण्यास मदत होणार आहे .
हा फेस्टिव्हल ४ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री १० सुरु राहणार आहे . कोकण विकासविषयक परिसंवादाचे दर रोज आयोजन केले जात आहे . कोकणची संस्कृती ,कला ,रोजगार ,बांधकाम व्यवसाय ,स्टार्ट अप ,पर्यटन ,गुंतवणूक ,फळ प्रक्रिया ,खाद्यसंस्कृती विषयक स्टॉ ल या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत . १५० हुन अधिक स्टॉल,५०० हुन अधिक कोकणी उद्योजकांचा सहभाग ,२ लाखाहून अधिक कोकणप्रेमींची उपस्थिती आहे . फूड फेस्टिव्हल ,फॅशन शो , मनोरंजनाचे कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात आले आहे .