पुणे ः
अकाल तख्तचे माजी जत्थेदार दर्शनसिंग यांचा संवाद कार्यक्रम खासगी जागेत होत असताना आणि श्री गुरुसिंग सभा गुरूद्वारा (गणेश पेठ)चा आयोजनाशी काहीही संबंध नसताना या कार्यक्रमाच्या विरोधात गणेश पेठ गुरूद्वारा समोर बेकायदेशीर धरणे आंदोलन करून समाजाची दिशाभूल करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न माजी विश्वस्त भोलासिंग अरोरा, मोहनसिंग राजपाल आणि त्यांच्या सहकार्यांनी केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन श्री गुरूसिंग गुरूद्वारा (गणेश पेठ) विश्वस्तांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले. या निवेदनाची प्रत गणेश पेठ पोलीस चौकीत देखील देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटविले.
गुरूद्वाराचे विश्वस्त प्रितपाल सिंग खंडुजा, रणजीतसिंग अजमानी, जगजीत सिंग जुनेजा यांनी हे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले होते.
भोलासिंह अरोरा, बलबीरसिंह होरा, रणजीतसिंह अरोरा, हरपालसिंह राजपाल, हरमिंदरसिंह अरोरा, मोहनसिंह राजपाल, दर्शनसिंह ढिल्लो, परमजीत सिंह सलुजा, भजनसिंह खंडुजा, हरमिंदर कौर खंडुजा, कुलदीपसिंह टुटेजा यांच्याविरोधात हा तक्रार अर्ज देण्यात आला होता.
अकाल तख्तचे माजी जत्थेदार दर्शनसिंग खालसा यांचा संवाद कार्यक्रम शहरात 19 ते 21 जानेवारी दरम्यान सुखनिवास या खासगी जागेत होत आहे. अकाल तख्त हुकुमानुसार या आयोजनात गणेश पेठ गुरूद्वारा
ने
कसलाही संबंध
ठेवलेला
नाही.
तरीही
या कार्यक्रमाशी गुरूद्वाराचा संबंध जोडून त्याविरुद्ध भोलासिंह अरोरा आणि सहकार्यांनी गणेश पेठ गुरूद्वारा
समोर ध
रणे आंदोलन सुरू केले होते. तसेच या निमित्ताने आगामी दिवसात नियोजित असलेल्या गुरूद्वाराच्या सर्वसाधारण सभेचा संबंध जोडून दिशाभूल केली जात आहे. गुरूद्वराची जाणूनबुजून बदनामी केल्याबद्दल धरणे आंदोलनातील सहभागींवर कायेदशीर कारवाईचा विचार विश्वस्त मंडळ करीत आहे
,अशी माहिती विश्वस्त मंडळाने पत्रकाद्वारे दिली .
गुरूद्वारामध्ये जो कार्यक्रम होणार नाही. त्याविरोधात गुरूद्वारासमोर धरणे आंदोलन करून समाजाची व गुरूद्वाराची बदनामी करण्याचा खोडसाळपणा भोलासिंह, मोहनसिंह राजपाल यांचा गट करत आहे. 2016 साली गुरूद्वारा विश्वस्त निवडणुकीत 7 जागा जिंकून आल्यावरसुद्धा फेरनिवडणूक व्हावी अशा हेतूने त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विश्वस्त तरतुदीनुसार निवडणूक रद्द न झाल्याने या असंतुष्ट गटाचे मनसुबे उधळले गेले. त्यामुळे काहीतरी कारण काढून ते विद्यमान विश्वस्तांविरुद्ध तक्रारी, खोडसाळपणा करीत असतात आणि त्यासाठी आपल्या राजकीय पदांचा गैरवापर करीत असतात. दबाव आणत असतात. निवेदनातील मजकुराची कल्पना न देता आधीच समाजातील व्यक्तींच्या सह्या घेऊन त्याचा गैरवापर करीत असतात
,असे या पत्रकात म्हटले आहे .
भोलासिंग अरोरा, राजपाल गटाचा दर्शनसिंह यांच्या कार्यक्रमाला विरोध असेल तर त्यांनी सुखनिवास या ठिकाणी जाऊन, जिथे कार्यक्रम होणार, तिथे जाऊन धरणे आंदोलन करावे, गुरूद्वारासमोर बेकायदेशीर धरणे धरून शीख समाज, गुरूद्वाराला बदनाम करणे चुकीचे होते, असे विद्यमान विश्वस्त प्रितपालसिंह खंडुजा रणजितसिंह अजमानी, जगजीतसिंह जुनेजा यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अरोरा, राजपाल यांच्या कुरापतींची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही पत्रकाद्वारे विश्वस्तांनी केली आहे.
या धरणे आंदोलनामुळे गुरूद्वारा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, गुरूद्वारा परिसरातील शांतता बाधित होत होती. शीख समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे विश्वस्तांनी म्हटले आहे.