पुणे : कालवा समितीच्या बैठकीत पालिकेस 1150 एमएलडी पाणी मंजूर झाले असतानाही पालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाकडून आज पालिकेस दिले जाणारे पाणी कमी करण्यासाठी 2 पंप बंद करण्यात आल्याच्या बातमीने गदारोळ उठविला आणि याचवेळी महापालिकेत आलेल्या जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घ्यावी कि घेवू नये ? या पेचात न पडता पत्रकार परिषद घेतली .
काय म्हणाले ,मंत्री शिवतारे
1)आज सर्व अधिकारी कालवा फुटी प्रकरणी हायकोर्टात ,तिथे त्यांना फोन घेता येत नाही ,पण मी अशाप्रकारे पुण्याच पाणी कमी केलंय काय याची माहिती घेतो .
2)पुण्याने १३५० एमएल डी पर डे पेक्षा जास्त पाणी कुठल्याही परिस्थितीत उचलू नये .
3)खरे तर पुण्याला ४० लाख लोकांना ८.2 टीएमसी एवढ्याच पाण्याची आवश्यक्यता आमी १३५० एम एलडी पर डे म्हणजे १४ ते साडे चौदा टीएमसी पाणी देतो ,मग १६५० टीएमसी पाणी हवंय कशाला ?
4)शिस्त हवीच ,नियम पाळायला हवेत ,आणि जागतिक धोराहून अधिक पाणी वापरता कामा नये .
5)खरे तर धरणे बांधली तेव्हा ,ती शेती साठी बांधली गेली ,आता लोकसंख्या वाढली तर लोकांना पाणी देणेही आवश्यक आहेच .
6)शिवसेना पाणीकपात करू नये म्हणून मोर्चे काढते आणि तुम्ही शिवसेनेचे मंत्री एकप्रकारे पुण्याची पाणी कपात मान्य करता हि दुटप्पी भूमिका नाही काय ? या प्रश्नावर म्हणाले , टीआरपी साठी प्रश्न नकोत ,मी पाणी कपातीचे समर्थन करत नाही .पण पाणी जपून वापरलेच पाहीजे.