पुणे- प्रशासनाच्या धोरणांना वैतागलेल्या सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आज आयुक्तांना आज मुख्य सभेत बरेच काही सुनावले . प्रत्येक प्रभागातील आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमुळे शहरात कचऱ्याची समस्या उग्र होते आहे हा अनेक नगरसेवकांच्या तक्रारीचा धागा पकडून भिमाले यांनी आज सभागृहात , आयुक्तांना म्हटले , भाटीया प्रकरणाची आठवण करून दिली , सहा महिन्यांपासून प्रशासन अशा पद्धतीने काम करते आहे कि ज्यामुळे कचऱ्याचा प्रश्न जैसे थे राहतो आहे , अनेक विकास कामे रखडली आहेत . असा मनमानी कारभार करणार असाल तर आम्ही सर्व पक्षीय एकत्र येवून तुम्हाला राज्य शासनाकडे परत पाठ्विण्याचा ठराव करू शकतो असा इशारा हि त्यांनी दिला .. अर्थात हि सारी भीमगर्जना ,भिमाले स्टाईल.. हि आयुक्तांना समोर ठेवून त्यांनी केली असली तरी एएसआय आणि डीएसाय यांच्या बदल्या करणारे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या मागे टार्गेट होत्या अशीही माहिती उजेडात आली आहे . कारण या सर्व भिमटोल्यांना उत्तरे नंतर आयुक्तांनी नाही तर त्यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी अत्यंत शांतपणे दिली …. पहा कशा पद्धतीने भिमाले यांनी लगावले प्रशासनाला भिम टोले … जसेच्या तसे ….