पुणे-गेली महिनाभर जलसंपदा विभागाने घेतलेल्या पवित्र्यामुळे चर्चिला जाणारा ‘तथाकथित पाणी कपातीचा ‘ मुद्दा च आता संपुष्टात आल्याचे आज सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी दिलेल्या माहितीने स्पष्ट झाले आहे.
धरणात पाणी किती आहे ? ते पुरेसे आहे कि नाही ? महापालिकेकडे पाटबंधारे चे येणे किती आहे ? अशा विविध मुद्द्यांवर मंथने घडवीत पाटबंधारे खात्याच्या मुंडे यांनी पुण्याचे पाणी मुरते कुठे ? असा सवाल हि केला आणि माणशी किती पाणी द्यायला हवे ? पुण्याजवळ धरण म्हणजे पुण्याचे नाही असा पवित्रा देखील घेत स्थानिक नेत्यांना अडचणीत आणण्याचे वारंवार प्रयत्न केल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे .२०० एम एल डी ची दर दिवशी कपात करून पुण्याला ११५० एम एल डी एवढेच पाणी देऊ अशी स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी पुण्याच्या आणि पुण्याच्या नेत्यांच्या तोंडचे पाणीही पळविले .या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री पुण्यात आले असताना या विषयावर महापौर ,सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष या तिघांनी पाण्यासह विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे मांडले .
याबाबत तेव्हा कोण कोणत्या विषयावर मुख्यमंत्री द्वेंद्र फडणवीस यांनी काय आदेश दिले … याबाबत आज सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकारांना माहिती दिली..पहा आणि ऐका नेमके याबाबत श्री. भिमाले काय म्हणाले ….