पुणे- पावसाळा संपतो ना संपतो तोच ,कालवा फुटीच्या निमित्ताने पुणेकरांच्या पाण्यावर झालेला हल्ला ..किती दिवस ,कुठपर्यंत, कसे पुणे पचवेल .. याची चिंता करावी अशी स्थिती महापालिकेच्या नव्या सभागृहात तरी वारंवार दिसते आहे. कालवा फुटी आणि पुणेकरांना देण्यात येणारे पाणी यांचा प्रत्यक्षात तसा काही संबध नसला .. तरी पाटबंधारे खात्याने फर्मान काढले आणि पाणी कपातीची टांगती तलवार ..आज ना उद्या पुणेकरांच्या माथ्यावर कोसळणार हे ऑक्टोबर मध्येच स्पष्ट झाले . अनेक आंदोलने ,झाली, बैठका झाल्या ..आणि प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीही सभागृहात सातत्याने मांडल्या जाऊ लागल्या … आज देखील पुन्हा पाणी रे पाणी … च सभागृहात निनादले …पहाच एकदा हा व्हिडीओ रिपोर्ट ….