पुणे-सुमारे ३ वर्षात महापालिकेने एलबीटी च्या ७ ते ८ हजार कोटीच्या उत्पन्नावर पाणी सोडले काय ? असा प्रश्न निर्माण करणारी अभ्यासपूर्ण सरबत्ती काल कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी येथे मुख्य सभेत केली . पाण्याची टंचाई , पाटबंधारेला अन्य प्रकल्पाचे ६५ कोटी वळविण्याचा प्रस्ताव तत्पूर्वी या गोष्टीकडे बागवे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले . आणि महिनाभरात , म्हणजे पुढच्या महिन्यात प्रशासनाने यावर खुलासा करावा असेही आवाहन दिले .त्यांनी दिलेल्या लेखी प्रश्नांवर प्रशासनाने लेखी माहिती दिलेली आहे मात्र त्यावर चर्चा आज होणार नाही पुढच्या महिन्यात होईल असे महापौरांनी सांगितले यावेळी प्रशासनाने अपुरी माहिती दिल्याचा आरोप करत हे आव्हान दिले आहे ,
पहा नेमके बागवे यांनी काय म्हटले आहे .