पुणे : महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुरु केलेल्या कारवाईबाबत बोलायला उभे राहताच राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी ‘मुख्यमंत्री साईबाबांकडे भिकेचा कटोरा घेऊन गेले होते .. अशा विधानाने आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि भाजप सदस्यांचा आगडोंब उसळला .. यांना बाहेर काढा , यांना बोलायला बंदी घाला ,यांना माफी मागायला लावा … अशा विविध मागण्या करत हा संताप त्यांनी व्यक्त केला . मला बोलून द्या, मी माफी मागणार नाही, हि वाक्ये मिडिया मध्ये प्रसिद्ध झालेली आहेत ..असे यावेळी सांगण्याचा प्रयत्न जगताप यांनी केला . पण भाजप सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . मंदिरांवर कारवाई करण्यापूर्वी ,फुटपाथवर असलेल्या राजकीय पक्षांची कार्यालये देखील हायकोर्टाने काढण्याचे आदेश दिले होते त्याबाबत का बोलत नाहीत असा सवाल यावेळी जगताप यांनी केला . त्यांचे मुख्यमंत्र्यांबाबत चे वाक्य महापौरांनी कामकाजातून वगळले मात्र भाजप सदस्यांनी , जगतापांनी माफी मागितलीच पाहिजे असा आग्रह धरल्याने अखेर त्यांना बोलण्याची संधी काढून घेऊन महापौरांनी पुढील सदस्यास बोलण्यास सांगितले. ..पहा यावेळी कसा झाला महापालिकेच्या मुख्य सभेत गोंधळ ….