राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने कलेक्टर आॅफीस समोर तीव्र निदर्शन करण्यात आली . “कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहीजे “ ,
दोषींना त्वरित अटक झालीच पाहीजे “
पुणे;- न्याय द्या, न्याय द्या गोर गरीबांना न्याय द्या “ अशा धोषना देण्यात आल्या गेल्या काही दिवसांत शहरात भिंत कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले यामध्ये नियमांची पायमल्ली करण्यात आलेली आहे , गरीब मजुर , असंधटीत कामगार यांना त्यामुळे विनाकारण स्वत:च्या प्राणाची आहूती द्यावी लागली , यांत काहींचे तर नुकतेच उभे राहीलेले संसार होते , तर काही ठिकानी संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झालेले पहावयास मिळाले दरवेळी दिखाव्यापुर्ती कार्यवाही करून मुळ प्रश्न मात्र कायमच अनुत्तरीत राहत असतो , या गोर गरीब जनतेला कोणीच वाली राहलेला नाही असे भाजप सरकारने समज़ुन नये याकरीता पुण्याच्या जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले व या दूर्दैवी धटनेत बळी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करून कामगार कायदा हा फक्त कागदावर च राहणार का त्याची कधी अंमलबजावणी पन होणारं ? असे जिल्हाधिका-यांना विचारण्यात आले
मुख्यमंत्र्यांकडेच गूह खाते असूनही फिर्याद दाखल होवूनही गुन्हेगार सापडत नाहीत हे त्यांचे अपयशच आहे , यापुढील काळात तरी असे प्रकार होवून निरपराध व्यक्तींचा बळी जावू नये , समोरची व्यक्ती जरी गरीब असली तरी तीही मानुसच आहे ही भावना वाढीस लागण्याकरीता कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची व दोशींवर कठोर कार्यवाही करणाच्या मागण्या यावेळेस करण्यात आल्या
याप्रसंगी कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती सदर प्रसंगी
शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्द्रवादी रिपब्लिकन चे प्रमुख महेश शिंदे ,प्रदीप देशमुख ,रविंन्द्र माळवदकर ,प्रदीप गायकवाड ,साधना हरपळे , नितीन कदम, अरूण अल्हाट, कलेश्वर धुले , संतोष नांगरे, विजय ढाकले , गणेश नलावडे, फईम शेख, भोलासिंग अरोरा , विशाल नाटेकर , नितीन कळमकर इ प्रमुख उपस्थित होते