पुणे–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनव चौक येथे ‘सामना’ मध्ये विकृत मनोवृत्तीने असंस्कृत व गलिच्छ लेखण केल्याचा आरोप करत त्या निषेधार्थ शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना चेतन तुपे म्हणाले,ज्यांचे राजीनामे खिशात ठेवून ठेवून फाटले. त्यांची लायकी काय हे संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे.राज्यात दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षितता, शेतकरी अश्या अनेक प्रश्नांवर अपयश आल्याने आता दिशाभूल करून शिवसेना राममंदिर बांधण्याचा मुद्दा पुढे आणत आहे. या लबाडांना राज्यातील जनता कंटाळली आहे. राजीनामे देऊ असे म्हणुन सत्तेला चिकटलेले हे मुंगळे महाराष्ट्राचे काय कल्याण करणार आहे.आमचे नेते अजितदादा पवार हे बोलले ते खरे आहे. त्यांना पाच वर्षात दिवंगत नेते मा. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही बांधता आले नाही आणि हे चालले राममंदिर बांधायला, यांना तिकडे कोण ओळखतोय यांची तिकडे किंमत ती काय, स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसर्यावर दोषारोप करणे त्यांनी थांबवावे.
यावेळी नगरसेवक सुभाष जगताप,वनराज आंदेकर, निलेश निकम, बाळासाहेब बोडके, श्रीकांत पाटील, राकेश कामठे, विजय डाकले, संतोष नांगरे,विपुल म्हैसुरकर, अजय दराडे, अच्युत लांडगे, अमोल ननावरे, संजय गायकवाड, नितीन कदम, दिलीप अरुंदेकर, शंतनु जगदाळे,मिलिंद वालवडकर,अर्जुन गांजे, संतोष बेंद्रे. संतोष डोख,युसुफ शेख विक्रम जाधव,मृणालिनी वाणी,धीरज आरगडे, रूपेश आखाडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.