पुणे-दुष्काळ असतानाही मी पुण्याला पाणी कमी पडू दिले नाही आणि आता सारी धरणे भरून वाहत असतानाही पुण्यातल्या लोकांना पाण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत ,आम्ही सुरु केलेल्या भामा आसखेड योजनेचे काम ५ वर्षे झाली तरी भाजपला पुरे करता आलेले नाही ,पुण्याला यांनी नवीन काय दिले हो ..अहो पुणेकरांनो विचार करा जरा ..अशा प्रकारचे आवाहन करत आज राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी पद्मावती येथील कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना आपल्या खास ढंगात खडे बोल सुनावत ,पुणेकरांना आवाहन करत विशिष्ट मिडियाचेही कान टोचण्याचा प्रयत्न केला .आघाडीच्या उमेदवाराचे काम केलेच पाहिजे असे सांगत 25 वर्षे नगरसेवक असलेल्याआणि आता सहाव्यांदा नगरसेवक झालेल्या कॉंग्रेसच्या आबा बागुलांच्या स्वप्नांना लावलेले पंख कापत पर्वती मतदारसंघासह वडगाव शेरी,हडपसर आणि खडकवासला हे मतदार संघ राष्ट्रवादी लढवेल आणि शिवाजीनगर ,कसबा ,कँटोमेंट असे तीन मतदार संघ कॉंग्रेस लढवेल आणि कोथरूड मात्र अन्य मित्र पक्षाला दिला जाईल असे जाहीर करून बागुल समर्थकांना जोरदार धक्का दिला .पुण्यातील आण्णाभाऊ साठे रंगमंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आलेे हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्थित हाेते.
पुण्यातील आठ जागांपैकी चार जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे असणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. पुण्यातील अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात आयाेजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी ही घाेषणा केली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्तिथ होते. निवडणुकांच्या ताराखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी तर्फे आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, आघाडीमध्ये पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढविणार आहे. त्यात पर्वती, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासल्याच्या जागेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. तसेच इतर 3 जागांवर काॅंग्रेस निवडणुक लढविणार असून एक जागा मित्र पक्षाला साेडण्यात येणार आहे. बऱ्याच नव्या चेहऱ्यांना यंदा उमेदवारी देणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच जे गेले जे गेले त्यांना महत्व देण्याची गरज नाही. जुने गेल्यामुळे नवीन लोकांना संधी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच केवळ राष्ट्रवादीच्याच नाहीतर आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी काम करण्याचा सल्ला देखी पवारांनी यावेळी दिला. निवडणुकीला सगळे गटतट विसरुन सामारे जा असे म्हणत, निगेटिव्ह बाेलू नका नाहीतर निवडणुकीपर्यंत आजाेळी जाऊन रहा असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टाेचले. तसेच आघाडीचेच सरकार येणार हा विश्वास देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला अनेकांनी विविध पद्धतीने विराेध केला. जनादेश यात्रेसाठी अनेकांची धरपकड करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना कधीही दडपशाही केली नाही. महाराष्ट्र पाण्यात गेला तरीही जनादेश यात्रा थांबविण्यात आली नाही. गेल्या दाेन महिन्यात साडेतीनशे जी आर काढण्यात आले. निवडणूक आली की लाेकांना प्रलाेभने दाखविण्याचे काम सरकार करते. सत्तेची मस्ती सरकारला चढली आहे. असे म्हणत मुख्यमंत्री साहेब कधीच काेणाचे दिवस नसतात असा टाेला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. पवार म्हणाले, शिक्षणाचा खेळ खंडोबा केल्याने शिक्षण खातं विनोद तावडे यांच्याकडून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं. 5 वर्ष सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजपकडून लोकसभेला करण्यात आलं. आता कलम 370 पुढे करून विधानसभेला लाेकांची दिशाभूल करण्यात येत आहे. काश्मीर मधील निवडून आलेले नेते अजूनही नजर कैदेत आहेत. गुलाब नबी आझाद यांना काश्मीर मध्ये जाण्यासाठी सर्वोच न्यायालयात जावं लागलं. पुण्याबद्दल बाेलताना पवार म्हणाले पुण्यातील सर्व धरणं भरली असली तरी पाण्यासाठी पुणेकरांना आंदोलने करावी लागत आहेत. मी 10 वर्ष पालकमंत्री असताना दुष्काळ असताना देखील पुण्याला पाणी कमी पडु दिले नाही. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून दुसरीकडे अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत.भामा असखेडच्या प्रकल्पला आम्ही मंजुरी दिले तरी त्यांना 5 वर्षात पाईपलाईन टाकता आली नाही.पुण्याचे प्रश्न एकही आमदार विधानभेत मांडताना दिसले नाही.निवडणुक आली की राम मंदिर, जात, धर्म यावर राजकारण भाजपा करते. आम्ही अनेक गोष्टी केल्या पण त्याचा गाजा वाजा केला नाही. घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून पक्षांतर
घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून अनेकांनी पक्षांतर केले असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. अनेकांच्या साखर कारखान्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन भाजपात घेतले असल्याचे देखील पवार म्हणाले.