पुणे-पुण्याची आतापर्यंत एक वेगळी ओळख होती. आधी म्हटलं जायचं पुणे तिथे काय उणे पण आज या भाजप सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की आज म्हटलं जातंय पुणे तिथे ‘पाणी’ उणे असे मत राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी वडगाव बुद्रुक येथील परिवर्तन सभेत व्यक्त केले.याचवेळी बापट साहेब पुण्यासाठी काय केलं ? देशात पुणे शहर बलात्कारात तिसरे शहर म्हटले जाते आहे हेच का तुमचे अच्छे दिन ? असा सावळी त्यांनी केला आणि अखेरीस पुण्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला असताना पुण्याचे पोलीस मात्र गुन्हेगारांना पकडण्याचे सोडून हेल्मेट नाही ,म्हणून सामान्य पुणेकरांची धरपकड करत असल्याचे त्यांनी म्हटले.
आज पुण्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आम्ही सत्तेत असताना पुण्यात कधी पाण्याची कमतरता जाणवू दिली नाही पण आज भाजपला आठ आठ आमदार दिले, पण तरी देखील भाजपाने शहराला पाणी दिले नाही. निवडणूक आली म्हणून विविध कार्यक्रम राबविले जात आहे. सीएम चषक आयोजित करत आहे लोका़चे मन वळवण्याचा नवा फंडा या सरकारने आणला आहे. सरकार नियोजन करत नाही. भाजपच्या पुण्यातील 2 आमदारांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना सरकार पाठीशी घालीत आहे ,पुण्याला कोणी वाली उरला नाही ,पुण्यातील भाजपचे नेते प्रत्येक प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि मुख्यमंत्र्यांना फक्त नागपूरबाबत; जास्त प्रेम आहे. असा टोला देखील अजित पवारांनी मारला.संपूर्ण पुणे खोदुन ठेवले आहे. शहरात वाहतूक कोंडी आहे. मनपाचे काम होत नाही, पुण्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पुण्यात बलात्कारासारख्या घटना रोज घडत आहेत. पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. गुंडांना तडीपार केले जात नाही, पोलिसांचा वचक राहिला नाही. पण सरकार लक्ष घालत नाही. पालकमंत्री गिरीष बापटसुद्धा लक्ष घालत नाही, अशी टीकादेखील आ. अजित पवार यांनी केली.महापालिकेतील नगरसेवक कचऱ्याच्या ५०० बादल्या खरेदी करून साडेनऊ हजार बाद्ल्यांचे पैसे पालिकेच्या तिजोरीतून उकळतात . यांना निट सभागृह बांधता येत नाही, कात्रज ते स्वारगेट या 5 किलोमीटर च्या बीआरटी च्या सुशोभीकरणावर १०३ कोटी खर्च करूनही बीआरटी कोठे दिसत नाही अशा विविध प्रश्नी त्यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले .
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर कठोर टीका केली.
खडकवासल्यात कचऱ्याचे नियोजन नीट होत नाही, या सरकारला सोशल मीडियाची फार हौस आहे त्यामुळे सर्व सोशल मीडियावर मी सरकारला धारेवर धरते. इथला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक नगरसेवक कार्यक्षम आहे. जर कार्यक्षम नगरसेवकाचा पराभव होत असेल तर मला वाटतं की खरच ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.