सायकलमार्ग करताहेत वाहतुकीची कोंडी ..(का केला एवढा अट्टाहास २०१७ ची व्हिडीओ झलक )
पुणे- सायकल चालवा आणि आरोग्य सुधारा हे सांगणारे खूप आहेत आणि पुणेकरांच्या खिशातील शेकडो कोटी रुपये अशा सुधारणावादी योजनांसाठी उधळले गेलेत .त्यासाठी अनेकांनी अट्टाहास हि केला .पण आज काय स्थिती आहे ..पुण्यात कोण ,कोण किती लोक सायकली चालवतात ..किती संख्या आहे त्यांची … आणि सायकल चालवा ..प्रदूषण टाळा ..म्हणनारे खरोखर स्वतः सायकली चालवितात काय ? अशा अनेक प्रश्नांवर पुणेकरांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे .
पुण्यात ३५० कोटीचे सायकल मार्ग करणाऱ्या योजनेला मोठा अट्टाहास करत २०१७ मध्ये महापालिकेने कशा पद्धतीने मुख्य सभेत मतदान घेवून हा विषय कसा संमत झाला हे हा आम्ही इथे दिलेला व्हिडिओ सांगेल . जो २०१७ च्या मुख्य सभेतला आहे. पण आज काय स्थिती आहे या सायकल मार्गांची .. कि हे सायकल मार्गच वाहतुकीची कोंडी करत आहेत ? या प्रश्नांची उत्तरे माहिती असूनही पुणेकर बोलत नसतील तर अर्थात त्यांच्या सोशिक पणाला दोष द्यावा लागेल. या योजनेतील सायकली आणि त्यांचे मार्ग ..कुठे हरवलेत .काय अवस्था आहे ? याचा विचार प्रत्येक पुणेकराने करावा .
पुण्याहून हडपसरला निघा आणि सांगा येथील सायकल मार्गावर किती सायकली असतात. जिथे बीआरटी आणि सायकल मार्गाने चं स्राव्धिक कोंडी होते तो हा रस्ता म्हटले तर नवल वाटू नये .आणि मग अखेरीस जीवनाच्या धावपळीत अडकलेला पुणेकर हे सारे मार्ग धुडकावून आपली वाहने बीआरटी आणि सायकल मार्गावरून घुसवून पुढे मार्गक्रमण करतो ..नव्हे त्या शिवाय त्याला गत्यंतर उरत नाही .सातारा रस्त्यावरील पद्म्वाती ते रावत ब्रदर्स पर्यंत देखील सायकल मार्गाचा वेगळाच उपयोग होतो आहे. एक ना अनेक ठिकाणे वाहतुकीच्या कोंडीला हेच सायकल मार्ग अडथला ठरताना दिसत आहेत . पुण्यात कोणती वाहने किती ? आणि त्या संख्येनुसार त्यांना रस्ते उपलब्ध आहेत काय ? याचे उत्तर शोधून तशी योजना कोणी राबविणार नाही .सायकल मार्गाचा अट्टाहास गेली 15 वर्षाहून अधिक काळ पुण्यात लोकप्रतीनिधी आणि विशिष्ट आपमतलबी संस्था करत आल्यात पण दुर्दैवाने त्यांनी स्वतः फक्त फोटो पुरते सायकली वर बसण्याचे धाडस दाखविले. मग जर खरोखर यांनही सायकली वापरायच्या नव्हत्या आणि पुणेकर हि वापरतील असे चित्र नव्हते .. तर हा अट्टाहास करून आजवर शेकडो कोटींची उधळण नेमक्या कोणत्या कारणासाठी केली गेली ? हे न समजण्या इतके पुणेकर दुधखुळे निश्चित नाही . पण ठीक आहे करू द्यात त्यांना हे सारे ..पण जेव्हा त्यांच्या कृत्यांनी तुमची वाहने कोंडीत अडकून पडतात तुम्हाला त्रास भोगावा लागतो तो कुठवर सहन करणार आहात असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो .
एवढा अट्टाहास तुम्ही गरजूंना नौकऱ्या देण्यासाठी नाही केला. एवढा अट्टाहास तुम्ही बेघरांना घरे देण्यासाठी नाही केला .एवढा अट्टाहास पुण्यातून वाहून जाणारे पाणी अडवून साठविण्यासाठी नाही केला आणि एवढा अट्टाहास तुम्ही खरोखर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केला असता ..तर निश्चितच ते चांगले नसते काय ठरले ?जिथे ऐतिहासिक कोतवाल चावडी वाहतुकीची कोंडी होते म्हणून पाडली तिथली वाहतुकीची कोंडी सुटली काय ?निव्वळ पाडापाडी आणि अशा योजनांचे उद्दिष्ट्य जेव्हा ‘घोटाळा’ हेच असेल तर वाहतुकीची कोंडी पुण्यात दिवसेंदिवस जटील चं होत जाईल.ना ती बालगंधर्व पाडून सुटेल ना अन्य कोणत्या योजना लादून सुटतील . महापालिकेच्या हद्दींना कायमस्वरूपी मर्यादा घालणे .आणि हद्दीबाहेरील गावांचा .खेड्यांचा ती बकाल होण्यापूर्वीच विकास करणे ..हे जेव्हा साध्य केले जाईल तेव्हाच हि वाहतूक कोंडी सुटेल अन्यथा हा राक्षस पुणेकरांना कायमस्वरूपी छळत राहील यात शंका नाही .