पुणे-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर जिल्हामधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला . वानवडी येथील जांभुळकर गार्डनमध्ये झालेल्या या कार्यकर्त्यांचा मेळावास रघुनाथ ढोक , पंढरीनाथ बनकर , प्रितेश गवळी , शिवराम जांभुळकर , शंभूसेठ जांभुळकर , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंजिरी धाडगे , समीर धाडगे , माजी नगरसेवक संदीप लडकत, रेखा जांभुळकर ,विठ्ठल सातव , प्रा . गौतम बेगाळे , माजी महापौर वैशाली बनकर , नगरसेविका मंजिरी धाडगे , सुनीता भगत , पिंपरी चिंचवड विभाग महिला अध्यक्षा वंदना जाधव , चंद्रशेखर भुजबळ , पोपट चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते .
समता परिषदेचे काम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दिलेला समतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केला पाहिजे . समता परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निर्माण झाले तरच समता सैनिकांना न्याय मिळेल असा विश्वास प्रा . गौतम बेगाळे यांनी व्यक्त केला .
ओ बी सी एकत्रित आले तर समता परिषदेची ताकद वाढणार आहे . या ताकदीचा उपयोग समाजाचा विकास करता येईल . असे विठ्ठल सातव यांनी सांगितले . यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव एकमताने समंत करण्यात आला .
या मेळाव्याचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत प्रितेश गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन पंढरीनाथ बनकर व रघुनाथ ढोक यांनी केले तर आभार माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी मानले .