पुणे-मोदी सरकारच्या काळात सर्वात घोटाळे बँकामध्ये झाले असून ७०६०४ कोटी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत . त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक व आय सी आय सी आय बँक या बँकामध्ये घोटाळे झालेले आहेत ,आतापर्यंत आठ लाख कोटी रुपयांची कर्जे परत आलेली नाहीत त्यामुळे बँकांचा एन पी ए वाढत आहे ., त्यामुळे मोदी हे फक्त परदेशात बोलतात आपल्या देशात बोलत नाही , त्यामुळे हे फेकू सरकार असल्याचे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले .
पुणे कॅम्प भागात डेक्कन टॉवर येथे ‘” फेकू सरकार “…..या विषयावर आमदार अनंतराव गाडगीळ यांचे टॉकिंग पॉईंट द्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . त्यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रम अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष करण मकवानी , राजाभाऊ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , मोदी सरकरने जाहिरातीवर ३७५५कोटी रुपये खर्च केले . एजन्सीला ११०० कोटी रुपये देण्यात आले . मन कि बातला १०० कोटी , कॅलेंडरला २९९ कोटी रुपये खर्च करण्यात आला . काँग्रेसच्या आणलेल्या योजनांना दुसरी नावे या सरकारने दिल्या आहे . यामध्ये इंदिरा आवास योजनेला पंतप्रधान आवास योजना , निर्मल ग्राम योजनेला स्वछ भारत अभियान , तर राजीव गांधी जीवनदायी योजनेला महात्मा फुले जीवनदायी योजना नावे दिली आहेत . .आज देशात ८९३ प्रकल्पांचे काम रखडले आहे . काँग्रेसच्या काळात बँकामध्ये १३ टक्केच्या पुढे डिपॉजिट होती , परंतु मोदी सरकारच्या काळात सध्या १० टक्केच्या डिपॉजिट नाहीत. एकीकडे पुण्याला स्मार्ट सिटी बनविणार असल्याचे सांगतात . परंतु आर्थिक तरतुदीमध्ये ७ टक्के खर्च करण्यात आला आहे . पुण्यासाठी ५६ प्रकल्पांचे काम करणार होते . त्यामध्ये फक्त १० प्रकल्पांचे काम झालेले आहे . हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे . काशेवाडी कसबा पेठ स्मार्ट सिटी का करत नाही बाणेर औंध भागच स्मार्ट का करतात असा सवाल आमदार गाडगीळांनी उपस्थित केला . पुणेकरांची शुध्द फसवणूक सुरु आहे . पुण्याची मेट्रो हि पालकमंत्री व खासदार यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे रखडली . पुण्याचे खासदार मेट्रो जमिनीखालून न्यायचे सांगतात तर पालकमंत्री मेट्रो जमिनीवरून नेण्याचे सांगतात त्यामुळे पुण्याच्या मेट्रोचे काम रखडले .
गेल्या चार वर्षात लघु उद्योगामध्ये ५० टक्के घट झाली आहे . त्यामध्ये ३५ टक्के कामगार या लघु उद्योगांमधून कमी झालेले आहेत . २९८४ कंपन्या करार झाले परंतु पुढे काय झाले नाही . मेक इन इंडिया कागदावरच राहिली . जी एस टी ची कर प्रणाली चुकीच्या पध्दतीने लावण्यात आली . यामध्ये त्यांनी सांगितले सोन्याच्या बिस्किटाला ४ टक्के , खायच्या बिस्किटाला १८ टक्के , चॉकलेटला २८ टक्के त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे . शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये ५८ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले . एका फॉर्ममध्ये ६० प्रश्न असल्याने शेतकरी वैतागले , त्यामुळे शेतीचे उत्पादन घातले . संपूर्ण बांधकाम क्षेत्रात मंदी आली आहे . त्यामुळे गवंडी , सुतार , प्लंबर , प्लास्टर कामगार , रंगारी , इलेक्ट्रिक्शन कामगार बेरोजगार झाले आहेत . यामध्ये छोटे व्यावसायिक पूर्णपणे संपले . आणि आर्थिक व्यवस्था कोलमडली . अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प आणला आहे परंतु यामध्ये १२ रेल्वे स्टेशन हे गुजरात मध्ये आहेत तर ४ रेल्वे स्टेशन महाराष्ट्र्रात आहेत तरीदेखील या प्रकल्पासाठी ५० टक्के खर्च हा महाराष्ट्र सरकारकडून घेतला जात आहे. या सरकारची नोटबंदी पूर्णपणे फसली आहे . १२० लोक रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडले . नोटाबंदी होऊन देखील जम्मू काश्मीरमध्ये खोट्या नोटा सापडल्या . तसेच ३८ टक्के दहशतवादी वाढले . ऑनलाईन व्यवहार हा परदेशातील कंपन्यांना काम मिळावे म्हणून ऑनलाइन व्यवहार करण्याचा घाट घातला जात आहे . अमेरिकेत आजदेखील फक्त १९ टक्के लोक ऑनलाईन व्यवहार करतात . तसेच फ्रांस व जर्मनीमध्ये १ टक्के ऑनलाईन व्यवहार करतात . महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आले . १८ मंत्र्यांचे घोटाळ्याचे आरोप झाले . सर्वोच न्यायालयातील ४ न्यायमूर्तीनी या सरकारबदल तक्रार केली . देशामध्ये आजमितीला १०७९ न्यायाधीशांची गरज असून फक्त ६०१ न्यायाधीश नेमण्यात आले आहे . त्यामध्ये उच्चं न्यायालयामध्ये ४० लाख केसेस तर सर्वोच्च न्यायालयात ६०००० केसेस प्रलंबित आहेत . हे सरकार मीडियावर दबाव आणण्याचे काम करीत आहे . मोदी सरकार चार वर्ष झाले सत्तेवर आले असून त्यांनी एकदा देखील पत्रकार परिषद घेतलेली नाही . आपल्या विरोधामधील बातम्या दाबण्याचे काम हे सरकार माध्यमांवर दबाव आणून करीत आहे . आजच्या घडीला ११९५ भारतीयांनी परदेशात पैसे ठेवले आहेत . त्यामध्ये २५४२० कोटी रुपये बाहेर आहेत . त्यामध्ये किती पैसे मोदी सरकराने आणले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला .
या कार्यक्रम अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले कि , पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे मोदी सरकारच्या खोटा चेहरा दाखविण्यासाठी लवकरच पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे , हि पुस्तिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे . काँग्रेस पक्षाने लोकशाही टिकविण्याचे काम केले आहे . जनतेला देखील वाटत आहे कि काँग्रेस सत्तेवर आली पाहिजे . काँग्रेस सरकार चालवू शकते . भाजप दिशाभूल करून सरकार चालवीत आहे . यापुढच्या काळात काँग्रेस पक्ष बूथ कमिट्या मजबूत करण्याचे काम करणार आहे . माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे संयोजन पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले . तर आभार पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी मानले .