पुणे,: “ जीवन जगण्याची कला योग शिकविते. प्राचीन काळी भारतातील ऋषी मूनिंनी योगाभ्याच्या साधनेतून आपल्या तन व मनाला नियंत्रित केले होते. त्यातूनच त्यांना सुखाची अनुभूति होत असे. परंतू कालानुरूप मधल्या काळात योगाला वेगळे वळण मिळवून ते फक्त बंद गुफेत केल्या जाते अशी धारण झाली होती. या धारणेला छेद पाडत रामदेव बाबा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा योगाला संपूर्ण जगात महत्व प्राप्त करून दिले.” असे विचार हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे आचार्य स्वामी विप्रदेव यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कोथरूड येथील एमआयटीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या योग शिबीराच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी अमेरिकेतील यामाह मोटर्स फायनान्स कॉर्पोरेशनच्या रिस्क आणि स्टॅस्टेजीकचे प्रमुख अधिकारी विजय पाटील, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. अरूणा चाफेकर, डॉ.शुभदा कामत, आयुर्वेदाचार्य डॉ. गिरीष कामत आणि पतंजली योग समिती (पुणे पश्चिमचे प्रमुख) योग शिक्षक गोविंद गाडगीळ हे उपस्थित होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्रो होस्ट डॉ. आर.एम.चिटणीस, प्रोहोस्ट डॉ. श्रीहरी होनवाड, कुलसचिव प्रा.डी.पी. आपटे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर यांच्यासह एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील संचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हजारो विद्यार्थी या योगा शिबीरात सहभागी झाले होते.
आचार्य स्वामी विप्रदेव म्हणाले,“योगाभ्यासामुळे मानवाची शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक उन्नती होण्यास मदत मिळते. त्यामुळे आपल्याला मन व बुध्दीचा विकास करण्यासाठी योग हा महत्वाची भूमिका बजावत असतो. योग साधनेच्या माध्यमातून भारत हा जगात विश्व गुरू म्हणून पुढे येईल. त्यासाठी समाजातील सर्व लोकांना योगाचे महत्व पटवून दिले पाहिजे. मनातील वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी योग हे एकमात्र साधन आहे.”
“ योगावस्थामध्ये कर्म करण्याच्या स्थितिला योग असे म्हणतात. शुध्द आहार, शुद्ध विचार आणि शुध्द संगत असल्यास त्याला योग असे म्हणू शकतो. रोजच्या जीवनात प्रत्येकाने योगा करावा असा संकल्प ही त्यांनी उपस्थितांना दिला.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारताने जगाला दिलेली सर्वात अनमोल देणगी म्हणजे योग आहे. याच्याच माध्यमातून विज्ञान आणि धर्माला जोडण्याचे कार्य केल्या जात आहे. तसेच, मन, बुध्दी आणि शरीर याला जोडण्याचे काम याच माध्यमातून होते. २१व्या शतकात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याचे दायित्व भारताचे असेल. योगाच्या माध्यमातून जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविले.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ आमच्या विद्यापीठात सर्व विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण नित्य नियमाने दिले जात आहे. म्हणून येथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा शारीरिक, मानसिक व बौध्दिक दृष्या सक्षम व संस्कारीत असतो.”
विजय पाटील म्हणाले,“ बोस्टन येथील एमआयटीमध्ये फक्त स्मार्ट इंजीनियर तयार केले जातात. परंतू भारतातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतून उत्तम संस्कार युक्त असे इंजीनियर तयार केले जातात. योगातून सर्व मानव जातीमध्ये बदल घडू शकतो. त्यामुळे प्रत्येकानी योगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना योगाच्या माध्यमातून घडविले जात आहे.”
गोविंद गाडगीळ यांनी योगाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.