पुणे- भाजपने मंदिर आणि जातीय समीकरणे सोडून विकासावर बोलले पाहिजे असा घरचा आहेर राज्यसभा सदस्य आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी 5 राज्यातील निवडणूक निकाल लागताना दिला आहे .तर भाजपची फसवेगिरी आणि त्याखाली दडलेला मनुवादी चेहरा उघडा झाल्याने जनतेने त्यांना झिडकारले आहे असे पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी म्हटले आहे .
त्यांनी असे म्हटले आहे कि ,राजस्थान मध्ये भाजपला फटका बसेल हे मला ठाऊक होते पण मध्यप्रदेश मध्ये बसलेला झटका पाहता नक्कीच विचार करण्याची गरज आहे.आणि ३ राज्यात ६५ खासदारांपैकी ६२ खासदार भाजपचे असताना अशी राज्ये भाजपच्या हातून निसटत असतील तर नक्कीच हि धोक्याची घंटा आहे.आतापर्यंत भाजपने सुरु ठेवलेल्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत ,ती म्हणजे जातीय समीकरणे,किंवा मंदिर ,मस्जिद ,नामकरण ,पुतळे,हे सर्व सोडून २०१४ साली नरेंद्र मोदींनी जो विकासाचा नारा दिला होता ,त्याबद्दल बोलले पाहिजे . छत्तीसगड आणि राजस्थान भाजपच्या हातून जाईल हे ठाऊक होते पण मध्यप्रदेशची पीछेहाट पाहता विचार केला पाहिजे असे काकडे यांनी म्हटले आहे.
पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी , भाजपचा मनुवादी चेहरा लोकांसमोर उघडा झाल्याने आणि भाजपने निव्वळ भूलथापा दिल्याचे लक्षात आल्याने कॉंग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे असे म्हटले आहे .
तर या शिवाय व्यापारीसेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनी जीएसटी आणि नोटबंदी ने व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला . आणि तो सहन करूनही प्रत्यक्षात फायदे काहीच दिसून आले नाही याचा फटका भाजपला बसला . खोटे बोल आणि रेटून बोल हि भाजपची पद्धत लक्षात आल्याने आता २०१९ मध्ये भाजपला त्याचा फटका बसेलच असेही ते म्हणाले . या शिवाय यावेळी शिरूर कॉंग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर यांनी हि आपल्या भावना व्यक्त केल्या …. पहा आणि ऐका ..नेमके कोण काय म्हणाले …