महाबळेश्वर -परिसरात होत असणाऱ्या संततधार पावसामुळे व वेण्णालेक वरून वाहत असल्यामुळे महाबळेश्वर वाई रस्त्यावर रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः प्रभावी झाली असून झाली आहे. महाबळेश्वर परिसरात मागील आठ दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने महाबळेश्वर पाचगणीला पाणीपुरवठा करणारा तलाव पूर्ण भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.
हे पाणी रस्त्यावर आल्यामुळे महाबळेश्वर वाई रस्ता वाहतूक प्रभावित झाले आहे. गेहू गेरवा केंद्र समोर समोरील रस्त्यावर पाणी साठले आहे. यामुळे मुंबई पुणे वाई बाजूकडून महाबळेश्वरला जाणार आहे. महाबळेश्वरला जाणारी वाहने संथ गतीने जात आहेत. आता पोलिसांनी ही वाहतूक बंद केली असून क्षेत्र महाबळेश्वर कडून वाहतूक महाबळेश्वर शहराकडे वळविण्यात आली आहे.
महाबळेश्वर येथे एक जूनपासून बाराशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मागील एक दिवसात 123 मिलिमीटर पाऊस महाबळेश्वर येथे पडला आहे. यामुळे या परिसरात ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून पाणी वाहणारे रस्ते बंद केल्यामुळे बंद केल्यामुळे पाणी आता रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे या परिसरातील महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला मोठा पाण्याचा धोका बसू शकतो.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प!!
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी (ता. खेड) आणि वाशिष्ठी (ता. चिपळूण) या नद्या धोक्याच्या पातळीवर आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या नद्यांना पूर आला असून दोन्ही ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे.