पुणे-आज लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने यूजी-पीजी शिष्यवृत्ती पुरस्कार समारंभाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एसजी बर्वे हॉल, अल्प बचत भवन येथे आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या ६०० मुलींना यावेळी शिष्यवृत्ती देण्यात आली. या मुली पोस्ट ग्रॅज्युएट्स, विज्ञान, प्रथम वर्ष अभियांत्रिकी, नर्सिंग, सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि फार्मेसी सारख्या शाखांमध्ये शिकणाऱ्या आहेत.
हा कार्यक्रम 2 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला होता . सकाळच्या सत्रातील कार्यक्रमासाठी मिनू दस्तूर (अध्यक्ष आणि सीईओ, निहिलेंट लिमिटेड) चे मुख्य पाहुणे आणि रश्मि दवे (१९८९ मधील एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता, आणि टेक्नीशियन एक्सपर्ट, पर्सिस्टेंट सिस्टम्स लिमिटेड) उपस्थित होते. त्यांना यावेळी सन्माननीय पाहुण्यांच्या रुपात सन्मानित करण्यात आले.
दुपारच्या सत्रामध्ये विक्रांत गांधी (सीएस आणि हेड, कॉरपोरेट सस्टेनेबिलिटी, टाटा टेक्नोलॉजीज) हे मुख्य अतिथी आणि वृषाली गौड़ (२००० मधील एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता आणि भारत सलाहकार, आंतरराष्ट्रीय एकीकृत रिपोर्टिंग काउंसिल) उपस्थीत होते त्यांना यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून सम्मानित केले गेले.
यावेळी सर्व मुख्य आणि सन्माननीय अतिथींनी उपस्थीत पालकांना त्यांच्या मुलांना शिक्षित करण्याचे महत्त्व सांगितले. जेणेकरुण भविष्यात ही मुले आत्मविश्वासू व मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनू शकतील.
आपले विचार व्यक्त करताना पद्मश्री लीला पुनावाला यांनी सर्व पालकांना संबोधित केले, त्या म्हणाल्या शिक्षित मुली बहुआयामी आसतात आणि त्यांच्याकडे सर्व जवाबदाऱ्या हाताळण्याची क्षमता असते. यावेळी त्यांनी मुलींना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच त्यांनी निवडलेले आयुष्य जगण्याची परवानगी देण्याची पालकांना विनंती केली.