पुणे-कोंढवा येथे अल्कोन स्टायलस च्या इमारतीची सीमाभिंत कोसळून लगतच्या बांधकाम प्रकल्पाच्या मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून 15 जणांचे मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी जरी बिल्डर आणि संबधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली असली तरी,या बरोबर प्रशासकिय अधिकारी यांची हि जबाबदारी होती ,त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी असा पवित्रा राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र द्वारे मागणी केल्याचे सांगितले .तर खासदार सुप्रिया सुळे ,वंदना चव्हाण यांनी हि स्मार्टसिटी म्हणविणाऱ्या पुण्यातील अशा घटना म्हणजे प्रशासनाचे अपयश असल्याचे म्हटले आहे .पहा हा एक व्हिडिओ रिपोर्ट