पुणे- पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम नंतर … आता अगोदर सनबर्न ..होवू द्यात , नंतर पाईपलाईनचे काम काम सुरु करा.. सनबर्न होईपर्यंत रस्ते खोदून कोणतेही काम करू नका असा अजब तऱ्हेचा गजब कारभार हिंजेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी राबवीत असून या साठी चक्क त्यांनी ग्रामपंचायत आणि भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींंना देखील चुकीचे गुन्हे दाखल करत धाकात ठेवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप येथील नगरसेवक किरण दगडे यांनी केला आहे.या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेवूनही अद्याप पोलीसिराज आहे तसेच असल्याने आता सनबर्न आणि बावधन च्या पाईपलाईन चे काम यावरून या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकरता येणार नाही .विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात एकाबहुआयामी बांधकाम व्यावसायिकानेच सन बर्न च्या यशस्वीतेसाठी शड्डू ठोकल्याने पोलीस त्यांच्या पाठीशी आणि गाव करी त्यांच्या समोर असा सामना रंगू नये म्हणजे झालं .
या संदर्भातील हकीकत अशी कि, आजतागायत विविध संस्था संघटना यांनी सनबर्न ला आपला विरोध कायम ठेवला याबाबत वारंवार पत्रके काढली ,निवेदने दिली .. पण सरकारी पातळीवरून अद्याप काहीही दाखल घेतली गेली नाही . आता याचा फटका चक्क भाजपच्या बावधन च्या सर्पांचा असलेल्या पियुषा दगडे आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक असलेले त्यांचे पती ..प्रख्यात मुळशी पॅटर्न सिनेमाचे निर्माते किरण दगडे यांना हिंजेवाडी पोलिसांच्या नव्या पॅटर्नची अनुभूती घ्यावी लागते आहे . या संदर्भात त्यांनी कियेक पाणी तक्रारींचा पानगुच्छ समोर ठेवला. जेव्हा ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु केले तेव्हा … काही जणांनी त्यास विरोध करत काम करणाऱ्यांना मारहाण करून पिटाळून लावले .तेव्हा ग्रामपंचायतीचे सदस्य , सरपंच यांनी हे काम करणाऱ्यांची तक्रार घेऊन , त्यांना पोलीस बंदोबस्तात काम करू द्यावे असे पोलिसांना कळविले . पण झाले उलटेच .. 2 दिवसानंतर त्यांना समजले पोलिसांनी अशी कुठलीच तक्रार नोंदवून घेतली नाही . उलट अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीर पणे खोदाई केल्याबद्दल गुन्हा दाखल करून ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनाच दणका दिला . याबाबत जाब विचारायला गेलेल्याला .. तुला अटक करेल असा दम भरला. त्यानंतर गेलेल्या नगरसेवकाला ‘ सन बर्न ‘ होऊन जाऊ द्यात नंतर कामे करा, असा झक्कास सल्ला दिला .विशेष म्हणजे आपल्या तक्रार अर्जांना पोहोच हि दिली जात नाही अशी तक्रार घेऊन नगरसेवकाला उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली . त्यावर केवळ पोहोच मिळाली पण… पोलीसीराज कायम … आता आम्ही पालकमंत्री बापटांना साकडे घालू, लोकांना आम्ही नव्या वर्षात तरी रोज पाणीपुरवठा करू असे स्वप्न दाखविले होते ते आम्हास पुरे करू द्यात असे सांगू …ग्राम सभा बोलावू .. आणि रीतसर पाणी पुरवठ्याचे ग्रामपंचायतीचे काम अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवीची मागणी करू .. असे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले …