पुणे- दक्षिण पुणं,म्हणजे ऐतिहासिक,निसर्गसंपदा लाभलेलं पुण्याचं सुंदर असं दक्षिणद्वार समजलं जात . पण आता या दक्षिण पुण्याचं नैसर्गिक सौंदर्य लोप पावत चाललं, कॉंक्रीटच्या जंगलानं आणि बेसुमार लोकसंख्येनं बजबजपुरी बनू पाहणारंहे दक्षिण द्वार आणि येथील जपता येईल तेवढं निसर्ग सौंदर्य जपता जपता खुद्द लोकप्रतिनिधींचीही कसोटी लागते आहे. कात्रजच्या ऐतिहासिक अशा पेशवेकालीन धरणाच्या म्हणजे वरच्या तळ्याला ‘गजकरण’ जणू झालं आहे. या तळ्याला चहुबाजूनी नाले ,गटारे यांनी वेढलं आहे. आणि जलपर्णीनं विळखा मारून तळ्याचं बिभत्सिकरण जणू आरंभले आहे.
या तळ्याची स्वच्छता राहावी, येथील पाणी स्वच्छ राहावं,म्हणून झटू पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता हाथ टेकण्याची वेळ जणू येवून ठेपली आहे. कात्रजचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासनाच्या उद्दामखोरीनं सुंदर तळ्याचं रोगराई पसरवणाऱ्या डबक्यात रुपांतर होऊ नये म्हणजे झालं.
या तळ्यात जलपर्णी आणून टाकल्याचा संशय व्यक्त करत ,येथे येणारे ड्रेनेज चे घाण पाणी ,जलपर्णी काढून तळं स्वच्छ राखण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून सातत्याने होऊ लागलेली दिरंगाई यामुळे ,आपल्या संयमतेचा अंत आता कोणी पाहू नये असा इशारा देण्याची वेळ त्यांच्यावर येते आहे. अवघी ८ माणसे जलपर्णी काढीत आहेत आणि तेही 22 ऑक्टोबर पासून …पण हि जलपर्णी आहे तशीच जैसे थे दिसत आहे. रोज काढली जाणारी जलपर्णी आणि वाढणारी जलपर्णी यांच्यात जणू स्पर्धा सुरु असताना महापालिकेच प्रशासन मात्र का झोपेचं सोंग घेत आहे हे समजेनासे झाले आहे. रोज काढली जाणारी जलपर्णी घेऊन जाण्यासाठी वाहनव्यवस्था व्यवस्थित नाही, जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही . आणि तलावात मिसळणारे गटारांचे पाणी रोखण्याची मानसिकता उरली नाही असा आरोप करत महापालिका प्रशासनाला जागे करण्याचे काम नगरसेवक कदमांना करावं लागतंय … या संदर्भात हा एक छोटासा व्हिडीओरिपोर्ट ….