वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. ” ! – ज्येष्ठ विधीतज्ञ चंद्रकांत डहाळे
जुन्नर -मागील बऱ्याच वर्षांपासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’ व वातावरणातील बदल, अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाची तीव्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीतज्ञ चंद्रकांत डहाळे यांनी जुन्नर येथील न्यायालयाचे आवारात , वृक्षलागवड कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
याप्रसंगी जुन्नर न्यायालयाचे आवारात ज्येष्ठ विधीतज्ञ चंद्रकांत डहाळे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन , जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.जी. बागडे , सह न्यायाधीश पी. एम. कोळसे ,ए .एम. कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.जी. बागडे , सह न्यायाधीश पी. एम. कोळसे , ए.एम. कुलकर्णी , जेष्ठ व विधीतज्ञ उल्हास तांबे , जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन पडवळ, उपाध्यक्ष रणजित भगत पदाधिकारी , सदस्य,न्यायालयीन कर्मचारी ,पक्षकार उपस्थित होते.