ब्राम्हण समाजाला आरक्षण नको संरक्षण द्या
पुणे : राजकीय पक्षांनी राममंदिर उभारणीचा मुद्दा पुढे केला आहे, मात्र सत्तेत आल्यानंतरही राममंदिराची उभारणी होऊ शकली नाही त्यामुळे हा प्रश्न सामोपचाराने सोडवून सरकारने लवकरात लवकर अयोध्येत राममंदिर उभारावे. ब्राम्हण समाजाला आरक्षण नको, ब्राम्हण समाज स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम आहे. त्यामुळे आरक्षण ऐवजी संरक्षणाला प्राधान्य द्यावे तसेच भारतीय संस्कृती जतनासाठी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये व आरक्षण बाबत पुनर्मूल्यांकन करून वंचित घटकांना न्याय द्यावा असे महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिली.
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे आयोजित ब्रम्होद्योग २०१८ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवाच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष उदय महा , सरचिटणीस शाम जोशी, प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की , उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद झालटे, वकील आघाडीचे राजेंद्र पोतदार, प्रदेश सरचिटणीस विलास कौसाडीकर प्रदेश सरचिटणीस नीता कुलकर्णी , सरचिटणीस माधुरी देशमुख, आनंद दवे आदी उपस्थित होते.
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे २५ ते २९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत ब्रम्होद्योग २०१८ पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सव आयोजिला होता. या महोत्सवात प्रदर्शनामध्ये १५० उद्योजकांनी व संमेलनामध्ये एकूण ४५० उद्योजकांनी सहभाग घेतला असून जवळपास एक लाख लोकांनी या महोत्सवाला सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी यामहोत्सवामध्ये देशाच्या प्रगतीसाठी व ब्राम्हण समाजाच्या उन्नतीसाठी काही महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले व ब्राम्हण समाजाची ध्येयधोरणे ठरवण्यात आली. देशभरातील ब्राह्मण संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन, राज्यस्तरीय महिला मेळावा, वकील आघाडी मेळावा, ब्राम्हण उद्योजकांचे संमेलन, राज्यस्तरीय ब्राम्हण एकत्रीकरण मेळावायांचे आयोजन करण्यात आले होते.
या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने नवीन उद्योग कसा स्थापन करावा याविषयावर हर्षद बेळे, उद्योग विस्तार आणि जागतिक या विषयावर विवेक कोल्हटकर (दुबई)-, ट्रेडमार्क, ब्रॅण्डिंग एन्ड पेटंट याविषयावर जानकी भिडे, रचनात्मक संशोधनाचे महत्व या विषयावर दीपक घैसास, कार्पोरेट ट्रेनिंग व सायकॉलॉजि या विषयावर मिलिंद आपटे, संघटनांचे फायदे- मिलिंद कांबळे स्टार्ट अप इंडिया या विषयावर श्रीवर्धन गाडगीळ, बडवे ग्रुपचे चेअरमन श्रीकांत बडवे तसेच संजय कांडपाल, गिरीश चितळे, प्रसन्ना देशपांडे, अरालू मल्लिगे पार्थसारथी, किशनजी वाटनी यांचा समावेश आहे.
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “या राष्ट्रीय संमेलनात पाच प्रमुख ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये राममंदिराचा प्रश्नसामोपचाराने सोडवून सरकारने अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे. हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी शबरीमाला मंदिरातमहिलांना प्रवेश देऊ नये, काश्मिरी पंडितांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन त्यांच्या मूळ ठिकाणी केले जावे. ब्राम्हण समाजालाआरक्षणापेक्षाही संरक्षण प्राधान्याने द्यावे आणि आरक्षणाच्या बाबतीत विचारपूर्वक पुनर्वमूल्यांकन होऊन त्यात कालानुरूपआवश्यक बदल करावेत.”