श्रीकांत मुंदडा म्हणाले, “भोपळ्याचा रस आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. पचन चांगले होते तसेच चरबी कमी होते. फक्त कडू भोपळ्याचा रस किंवा काढून ठेवलेला रस बऱ्याच वेळाने पिऊ नये. भोपळ्याचा रसासोबत मधुपर्णीचा (स्टीव्हिया वनस्पती) रस, जवस, दालचिनी याचे सेवन आयोग्यासाठी चांगले असते. या वनस्पती हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा अशा विविध आजारांवर गुणकारी आहेत. हृदयाविकार झालेल्या जेष्ठांना शस्त्रक्रियेचा पर्याय सुचविला जातो. परंतु, वय वाढल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया करण्याची इच्छा नसते. अशांनी अॅलोपॅथी औषधासह निसर्गोपचार घेण्यास सुरवात करावी. त्यांना त्याचा फायदा दिसून येईल, आजाराची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होईल. निसर्गोपचाराचे विविध फायदे आहेत. तसेच या औषधांना कोणता विपरीत परिणाम नाही.”
हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक- श्रीकांत मुंदडा
पुणे : “बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होत आहेत. भारतामध्ये हृदयविकार होण्याचे सरासरी वय ४३ झाले आहे. हे विकार टाळण्यासाठी धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, मांसाहार, जँकफूड आदींपासून दूर राहायला हवे. तणावमुक्त जीवन जगात नियमित व्यायाम केला पाहिजे. जीवनशैली सुधारली, तर हे आजार टाळता येतात. आजारांना बळी पडल्यास अॅलोपॅथी औषधासोबतच निसर्गोपचारही सुरु ठेवावेत,” असा सल्ला निसर्गोपचार तज्ज्ञ आणि हृदयमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मुंदडा यांनी दिला.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागतर्फे श्रीकांत मुंदडा यांचे ‘निसर्गोपचार आणि हृदय रोग’ या विषयावर व्याख्यान झाले. एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात झालेल्या या व्यख्यानाला परिषदेचे अध्यक्ष विनय र. र, उपाध्यक्ष राजेंद्र सराफ उपस्थित होते.
राजेंद्र सराफ यांनी प्रस्तावना केली. विनय र. र यांनी आभार मानले.