विज्ञान परिषदेतर्फे डॉ. नीलिमा राजूरकर यांचे अणुउर्जेवर व्याख्यान
पुणे : मराठी विज्ञान परिषद व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनशास्त्रज्ञ डॉ. नीलिमा राजूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘अणुऊर्जा : मिथक आणि सत्य’ या विषयावर मंगळवार, दि. १६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. सर्व विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी हे व्याख्यान विनामूल्य खुले असणार आहे.
अणुऊर्जा म्हटले की आपल्याला आठवते ते दुसऱ्या महायुद्धात जपानमध्ये हिरोशिमा, नागासाकी येथे टाकलेले अणुबॉम्ब, १९७९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियातील तीन माईल आयलंड व १९८६ मध्ये युक्रेन, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेले अपघात. जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात होणारा विरोध. आज भारताकडे ७७८० मेगावॅट क्षमतेचे ७ अणुऊर्जा प्रकल्प आहेत. जगात सध्या अणुऊर्जा हीच योग्य आहे, अशी समजूत रूढ होते आहे. परंतु भारतात अणुउर्जेला भीतीपोटी विरोध केल्या जातो आहे. यातील मिथक काय? व सत्य काय? हे डॉ नीलिमा राजूरकरसांगणार आहते.