पुणे-मी समजा राष्ट्रपतींना भेटलो तर त्यांना सांगेन एक खून मला माफ करा … मला मोबाईल मध्ये कॅमेरा निर्माण करणाऱ्याचा पहिला खून करायचा आहे .. अशा वाक्यात समोर मोबाईल धरणाऱ्या असंख्य तरुणाईचा समाचार आज राज ठाकरे यांनी येथे घेतला . ते म्हणाले ..मला काही पाहू देतच नाही, गेलो कुठे कि आहेच हे मोबाईलवर असे काही, तर तसे काही ,….तेव्हा वसंत मोरे ,मी एकदा कोणाला न सांगता येथे येईल आणि बाग पाहून जाईल, आणि काही सूचनाही देवून जाईल
राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे उद्घाटन येथे झाले कात्रज च्या मोरे बागेत झालेल्या या महापालिकेच्या उद्यान निर्मिती पासून ते उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या संयोजानापर्यंत सर्व काम स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी पाहिले .येथील कोनशिलेवर महापौर यांच्या पासून भाजपच्या सर्व आमदारांची नावे होती ,व्यासपीठावरील फलकावर देखील महापौर मुक्ता टिळक यांचे नाव होते पण महापौर किंवा स्थानिक आमदार या महापालिकेच्या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत . यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेवक किशोर शिंदे, रुपाली पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्यक्षात कोनशिलेवर नावे कोणा कोणाची पहा … 2 मंत्र्यासह शहरातील भाजपचे आठ हि आमदार ..एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्याचे हि नाव . महापौर आणि आयुक्तांचे हि नाव कोनशिलेवर पण हि सारी मंडळी गैर हजर … आहे कि नाही गजब कारभार …उद्घाटक राज ठाकरे आणि बागेसाठी सातत्याने परिश्रम घेणारे नगरसेवक वसंत मोरे हजर..
असंख्य लोकांनी सुमारे 2 तास उन्हात बसून राज ठाकरे यांची प्रतीक्षा केली .ठाकरे आल्यानंतर त्यांच्या भोवती मोबाईलवर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ घेणाऱ्या असंख्य लोकांनी गर्दी केली .
जास्त वेळ न घेता राज ठाकरे यांनी आपले भाषण सुरु करताच पहिल्याच टप्प्यात त्यांनी या सर्व कॅमेरा पंटर्स चा समाचार घेतला .
राज म्हणाले, प्रत्येक शहरात मनसेच्या नगरसेवकांनी चांगली कामे केली आणि करीत आहेत. पण कामाला मतदान होते का? हाच मला प्रश्न पडला आहे, असे सांगून ते म्हणाले , निवडणुका आल्या की थापा मारल्या जातात. थापांवर जर मतदान होत असेल तर मग कशाला कुणी कामं करेल, अशा शब्दांत त्यांनी मतदारांवर थेट निशाणा साधला.
वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला तर बदलेल्या प्रभागात हि ते वाघासारखे काम करत आहेत . मी तर म्हणतो दर वेळेस बदलू देत त्याचा प्रभाग ..म्हणजे सर्वत्र काम तरी होईल ,वसंत जेथे जातो तेथे बागा फुलवतो. माझे नगरसेवक चांगलेच काम करतात .कचऱ्याच्या समस्यावर नगरसेवकांनी सात वर्षांपूर्वी त्यावर उपाय योजना करण्यास सुरुवात केली. चांगल्या प्रकारे कचरा प्रकल्प उभारून नागरिकांची कचरा समस्येतून सुटका केली. एवढी कामे करून देखील कामाला मतदान होते का? हाच मला प्रश्न पडला आहे. जर मतदान होणार नसेल तर काम का कराव? असा मुद्दा राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.मी येथे राजकीय भाषण करायला आलो नाही .. मी ज्योतिषी नाही ,पण मी बोलतो तसेच होते , माझे राजकीय अंदाज खरे ठरतात . संध्याकाळी बांद्र्यात सभा आहे ती जरूर ऐका असे ते जाता जाता सांगून गेले .
कात्रजच्या मोरेबागेत महापालिकेने हि बाग निर्माण केली आहे .मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच पुढाकाराने या बागेची निर्मिती झाली आहे .