उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘आदर्श माता’ व ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजन
नवी सांगवी-
गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘आदर्श माता’ आणि ‘समाजभूषण’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ‘आदर्श माता पुरस्कार’ देवून विमलबाई धुरगुडे (तुळजापूर, मंगरूळ), शकुंतला पवार (धारूर, मोर्डा तुळजापूर), धन्वंतरी गोजमगुंडे (लातूर), शालिनी चौधरी (अंबाजोगई), द्रोपदी काळे (चारे, बार्शी) यांना गौरविण्यात आले.
यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, परिमंडळ १ पुणेचे उपायुक्त सुहास बावाचे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, उदयपूरचे सरपंच माधवराव पाटील, पूजाताई महेश लांडगे, शुभांगीताई लांडे पाटील, विद्याताई जाधव, आयोजक प्रकाश इंगोले व डी. एस. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजभूषण पुरस्कारार्थी : डॉ. अंबिका पतंगे (स्त्री रोग तज्ज्ञ), स्मार्तना पाटील (पो.उप- आयुक्त परिमंडळ-१ पिं.चिं), प्रतिभाताई कव्हेकर पाटील (लातूर), डॉ. दीपाताई मोरे (उमरगा), अंजली तापडिया (सुवर्ण पदक विजेत्या), प्रीतीताई काळे (समाजसेविका), पूजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी), आशाताई सूर्यवंशी-मुठे, सुरेखा शेडे (समाजसेविका), स्नेहल शहाणे (लोकसेवा फाउंडेशन), ऍड. प्रीती वैद्य (संचालिका किनारा वृद्धाश्रम ), अर्चनाताई अंबुरे –उस्मानाबाद, पोपटबाई जाधव (लघुउद्योजिका), रिंका जाधव- काळे, अदिती साखरे, अनिता खांदवे – कराळे, निताताई मोघे, प्रतीक्षा इंगोले.
रवींद्र गायकवाड म्हणाले, पुरस्कारामुळे महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. मराठवाडा ही संताची भूमी आहे व आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिला या आपल्या मराठवाड्याच्या मातीतील आहेत. पिंपरी-चिंचवड ही त्यांची कर्मभूमी असली, तरी आपल्या जन्मभूमीवर तेवढीच माया व प्रेम करतात.
पुरस्कारार्थींचेच्या मनोगतातून सद्यस्थितीत समाजामधील एकमेकांसाठीचा ओलावा आणि संवेदना हरवत चालल्याच्या भावना व्यक्त झाल्या. दरम्यान, “स्वराज्य शांतीदूत परिवार” या संस्थेचे उद्घाटन व स्वराज्य महिला विशेषाकांचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक राजेंद्र कोरे यांनी, तर आभार डी.एस.राठोड यांनी मानले.