पुणे :- छत्रपतीं शिवाजी महाराज घडले ते जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले याशिवाय राष्ट्राप्रती निष्ठा व आदरभाव,शौर्य,निडरता ,कर्तव्यदक्षता अशा अनेक गोष्टींचे बाळकडू महाराजांना जिजामातांकडून मिळाले.यातूनच समजते कि, एक प्रतिभावंत,कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकांनाही तेवढेच परिश्रम घ्यावे लागतात. अशा भावना शिवप्रसाद मंत्री यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
त्यांच्या अतुलनीय जीवनप्रवासातून प्रेरणा घेत पालकांची ‘पालकत्वाची’ जबाबदारी किती महत्वाची आहे हे देखील त्यांनी पालकांना समजावून सांगितले. जिजामातांप्रमाणे कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची आणि मार्गदर्शनाची थाप घालणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
आय पेरेंट्स सत्रांतर्गत गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या आवारात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी तसेच समस्त शिक्षक , विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते.
‘पालक’ हे मुलांचे पहिले गुरु असतात त्यामुळे त्यांचे अनुकरण ते करत असतात म्हणूनच पालकांनी सकारात्मक गोष्टी स्वतःच्या अनुकारांतून मुलांना शिकवाव्यात अशा भावना सोनू गुप्त यांनी मांडल्या.