पुणे -साध्वी व साधुला निवडणूकीत उतरवून भाजप देश भगवा करण्याची तयारी करीत आहे.
त्यांना आताच रोखले पाहिजे. अन्यथा देशाचे वाटोळे होईल. या निवडणूकीत भाजपचा विजय
झाल्यास मोदी, शहा हुकुमशाह होतील. अशी टिका माजी केद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी
केली. महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ भवानी
पेठेत संविधान बचाव निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद
रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उमेदवार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते अरविंद
शिंदे, नगरसेवक आविनाश बागवे, माजी महापौर रंजनी ञिभुवन, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहूल
डंबाळे, रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, नगरसेविका लता राजगुरु, महेश शिंदे, गौतम
आर्केडे, सुशिल यादव, जमशेद शेख, हनुमंतराव गायकवाड, राहूल तायडे, पोपटराव गायकवाड
उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, एकीमुळे आपला पुण्यात विजय होईल. साठ महिन्यात भारत बदण्याची
भाषा करणाऱ्या मोदींनी देशाची वाट लावली. ते देश तोडण्याचे काम करीत आहेत. काँग्रेसने
धर्मनिरपेक्षेतेने देश चालविला. भाजप द्वेषाचे राजकारण करीत आहेत. ज्यांनी ग्रोद्रा हत्यकांडात
मोदींनी वाचविले. त्या आडवाणीला उमेदवारीही दिली नाही. त्यांचा वारंवार अपमान केला. ज्या
डाॕ. बाबासाहेबानी धर्मनिरपक्षेतेचा संदेश दिला. त्याचे नातु आज जातीवादी संघटनेला सोबत घेऊन
भाजपला मदत करीत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
मोहन जीशी म्हणाले, ही निवडणूक ऐतिहासिक आहे. या निवडणूकीतून लोकशाही वाचवायची
आहे. संविधानाने या देशाला मजबूत लोकशाही दिली. त्यास भाजपवाले सुरुंग लावण्याचा प्रयत्न
करीत आहेत. दलितांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना भाजपला धडा शिकविला पाहिजे.
मतदारांची शक्ती माझ्या पाठिंशी आहे. निवडून आल्यावर दलित, मुस्लिम बांधवावर दाखल
करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेईन. शहराच्या विकासात गिरीश बापट स्पिड ब्रेकर बनले
आहेत.
रमेश बागवे म्हणाले, ही निवडून लोकसभेची नाही, तर संविधान सुरक्षित करण्याची आहे.
मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे महाआघाडीच्या उमेवाराचा विजय निश्चित
आहे. काँग्रेसच्याच हातात देश सुरक्षित असल्याची भावना लोकांत जागृत झाली आहे. त्यामुळे या
निवडणुकीत लोक भाजपाला घरी बसवतील.
शरद रणपिसे म्हणाले, देशाचे भवितव्य निवडणूकीवर अवलंबून आहे. डाॕ. आंबेडकरांनी तयार
केलेल्या संविधानालाच भाजपने आव्हान दिले आहे. लोकशाही टिकविण्यासाठी आपल्याला भाजपाला
घरी बसविले पाहिजे. संस्थांत भांडणे लावली. अर्थव्यवस्था उध्वस्त केली. प्रत्येक क्षेत्रात मोंदी
हस्तक्षेप करीत आहेत.
अरविंद शिदे म्हणाले, भाजप जात, धर्माच्या नावाने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन
प्रचार करीत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातही दलितांवर अन्याय झाला. भाजपने धर्माधर्मात
भांडणे लावण्याचे काम केले. गिरीश बापटांनी दलताविषयी राजकारण केले.
राहुल डंबाळे, करण मकवानी, गौतम आर्केडे, आविनश बागवे, महेश शिंदे यांनी भाषणे केली.