पुणे –
गेल्या पाच वर्षात मोदींच्या आर्थिक धोरणामुळे गरीब अधिक गरीब झाले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. नरेंद्र
मोदींनी श्रीमंत अधिक कसे श्रीमंत होतील, याकडेच अधिक लक्ष दिले. देशातील गरीब मात्र दुर्लक्षित राहिले तसेच दलित
,मागासवर्गीय, आदीवासी, भटके – विमुक्त, अल्पसंख्यांक यांच्यावरही फार मोठे अत्याचार होत राहिले यासाठी नरेंद्र
मोदी सरकार आता सत्तेवरून दूर करून शाहू – फुले –आंबेडकर विचारांचे कॉंग्रेस व मित्र पक्षांचे सरकार केंद्रात
आणायचे आहे. त्याचबरोबर गरिबांना दरमहा किमान सहा हजार असे वर्षाला ७२ हजार रुपये मिळवून देण्यासाठी
कॉंग्रेस पक्षाला विजयी करा ,असे आवाहन कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी
आज सायंकाळी लोहियानगर येथून सुरु झालेल्या रॅलीच्या समारोपानंतर केले. या पदयात्रेत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते
खासदार हुसेन दलवाई व कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील काहीकाळ सहभागी झाले होते.
आज कसबा विधानसभा मतदारसंघातील रॅलीची सुरुवात लोहियानगर येथून झाली. याप्रसंगी कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस
व मित्र पक्षांचे शेकडो कार्यकर्ते, विविध पक्षांचे झेंडे, रिक्षातून निवेदने आणि देशभक्तीपर गीते आणि कार्यकर्त्यांचे
जयघोषचा नारा यामुळे सारे वातावरण भारावून गेले. लोहियानगर येथून ही रॅली चांदतारा चौक , मासे आळी , रवी
पाटोळे आळी , सहा नंबर कॉलनी , गोकुळ वस्ताद तालीम , स्वामी मठ , कस्तुरी चौक, गंजपेठ पोलीस चौक ,
मोमीनपुरा , विजय कदम चौक, सिंहगड गरेज , दलाल चौक, धनगर आळी , गौरी आळी , बंदिवान मारुती , फुलवाला
चौक, कृष्ण हट्टी चौक , बलवार आळी, दलाल चौक , सिंहगड गगरेज टोवर , शितलादेवी चौक, नाईक हॉस्पिटल ,जैन
मंदिर , सुभानशहा दर्गा , रविवार पेठ, श्रीनाथ चित्रपटगृह , शिवाजी रोड , फडगेट , मामलेदार कचेरी, खडकमाळ आळी
गणपती येथे समारोप झाला.
या पदयात्रेत शहर अध्यक्ष रमेश बागवे ,कमल व्यवहारे , कमल ढोलेपाटील,अरविंद शिंदे ,अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर
, रफिक शेख , विरेंद्र किराड , सुजाता शेट्टी, नीता परदेशी , झुबेर दिल्लीवाला यासह कॉंग्रेस –राष्ट्रवादी व मित्र पक्ष
आघाडीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.