पुणे- पुण्यातील वातावरण मोहन जोशी यांना अत्यंत अनुकूल असून भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. हे वातावरण संपूर्ण देशात असून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ शिवदर्शन येथील साहित्य सम्राट विजय तेंडूलकर नाट्यगृहात आयोजित नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल, ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, पत्रकार सुरेश भटेवरा, रोहित टिळक, नंदकुमार बानगुडे, सतीश
पवार, अमित बागुल, यांसह सागर आल्हाट, द.स. पोळेकर, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, घनश्याम सावंत, प्रकाश आरणे, मामा परदेशी, स्वप्नील नाईक, जयकुमार ठोंबरे, विश्वास दिघे, शफी मामु शेख, ओमराज मारणे, शर्वरी गोतर्णे, ज्योति आरवे आदीसह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कॉँग्रेसच्या जाहीरनाम्यात किमान उत्पन्न हमी योजना (न्याय योजना) जाहीर झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीबी विरुद्धची अंतिम लढाई जाईल आणि देशातील गरीबी दूर होईल. न्याय योजना ही क्रांतिकारी योजना आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी जीडीपीच्या ६ टक्यांची तरतूद करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तरुण पिढी घडविण्यासाठी जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिटल इंडियाची भाषा करणारे मोदी सरकारने एकही डिजिटल शाळा सुरु केली नाही. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा जेईई मेन्सच्या परीक्षेत प्रथम येणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांना’अछे दिन आले का?, तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले का?, तुमची गरीबी हटली का?, गॅस, डिझेल, पेट्रोल स्वस्त झाले का?, असे प्रश्न विचारात त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थित नागरिकांनी नाही..नाही असे उत्तर देत सभागृह डोक्यावर घेतले.
गायकवाड म्हणाले, हुतात्मा झालेल्या जवनांच्या नावाने मते मागणे असा प्रकार यापूर्वी कधी या देशात झाला नाही. त्यांनी असे म्हणताच नगिरिकांनी निषेध…निषेध.. अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वेळा मुख्यमंत्री झाले त्यावेळी कधीही त्यांनी गुजरातमध्ये चहावाला असल्याचे सांगितल्याचे ऐकिवात नाही. मात्र समाजमानाची मानसिकता लक्षात घेवून त्यांची चहावाला महणून प्रतिमा तयार केली गेली. जेणेकरून चहा पिताना त्यांची आठवण व्हावी. परंतु पाच वर्षे त्यांनी जनतेला फसविले आहे. त्यामुळे रोज चहा घेताना मोदींना आपल्याला सत्तेवरून घालवायचे आहे याचे स्मरण करा असे आवाहन त्यांनी केले.
मोहन जोशी म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोंग्रेस पक्षाने उमेदवारी देवून सर्वसामान्यांचा आदर केला आहे. मी नाही तर तुमच्यातील प्रत्येकजण निवडणुकीसाठी उभा आहे असे समजून काम करा. मोदी सरकारने पाच वर्षात काहीच काम केलेलं नाही. मी माझ्या वचननाम्यात जी आश्वासने दिली आहेत. त्याची पूर्तता काय झाली हे मी दरवर्षी समता भूमी येथे जावून सांगणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक आबा बागूल यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, स्व. राजीव गांधींनी १९८५ मध्ये संगणक आणण्याची घोषणा केली त्यावेळी याच भाजपने त्याला विरोध केला. आज ते डिजिटल इंडियाची भाषा करत आहेत. देशाचा आणि पुण्याचा विकास हा कोंग्रेसच्याच काळात झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून मोहन जोशी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा
असे आवाहन त्यांनी केले.