पुणे-मनुवाद्यांना प्राधान्य द्यायचं कि पुरोगामी ,सर्वधर्म समभाव मानणाऱ्याना प्राधान्य द्यायचं ,हे ठरविणारी हि निवडणूक आहे असे मत आज पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,राष्ट्रवादी चे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी शुक्रवारी काँग्रेसभवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले .भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी मतदानानंतर शहरात अधिकची पाणी कपात केली जाणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका तत्काळ मांडावी, असे आवाहनही त्यांनी बापट यांना दिले. दरम्यान, ‘पुण्याच्या ‘चौकीदारा’वर असलेले आरोप पाहता हा चौकीदार चोरच आहे,’ अशी टीका बागवे यांनी बापट यांचे नाव न घेता या वेळी केली.
याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे तसेच विविध दलित आणि अल्पसंख्याकआघाडीचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवामोर्चाचे नेते राहुल डंबाळे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, आरपीआय गवई गटाचे बबनराव अडसूळ, दलित पैंथरचे प्रकाश साळवे, आंबेडकरवादी गटाचे विठ्ठलराव
गायकवाड , रिपाईचे मोहम्मदभाई शेख, रिपब्लिकन युवामोर्चाचे अखिल दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख किरण कद्रे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
प्रारंभी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, सध्याची लोकसभा निवडणूक ही धर्मांध आणि पुरोगामी विचारांची लढाई आहे. मोदी सरकारच्या राजवटीत विशिष्ट धर्माच्या लोकांना तसेच मागासवर्गीयांना सापत्नभावाची वागणूक देण्यात येत आहे. त्यातूनच मॉब लिंचिंगसारख्या संतापजनक घटना घडत आहेत. या सर्वांना रोखण्यासाठी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून दलित-अल्पसंख्याक आघाडीतर्फे जनजागरण करण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडपट्टी आणि मोहल्य्यात जाऊन प्रचार करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, दीनदुबळ्यांना ताठ मानेने जगण्यासाठी संविधानाचे रक्षण करण्याची गरज आहे. देशाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच या निवडणुकीत ‘संविधान वाचवा -देश वाचवा’हे अभियान सुरु करण्यात आले असून त्यास सर्व धर्मनिरपेक्ष मतांच्या लोकांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. रिपब्लिकन युवामोर्चाचे नेते राहुल डंबाळे म्हणले, मॉब लिंचिंगसारख्या घटना हे मोदी सरकारचे फार मोठे अपयश आहे. याप्रकरणी न्यायालयाने आदेश देऊनही सरकारने वरवरची
कारवाई करण्यापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे लोकशाहीविरोधी मोदी सरकार पराभूतकरण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तिहीन एकत्र येऊन काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव म्हणाले, नरेंद्र मोदी यांना देशात हुकूमशाही आणावयाची आहे त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याची थेट भाषा करण्यात येत आहे. त्यासाठी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षवादी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याची गरज आहे.
श्री विठ्ठलराव गायकवाड यांनी आभार मानले.