पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाचवर्षातील केंद्रातील सरकारच्या आर्थिक अपयशाचे प्रतिबिंबच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिसून येते. अत्यंत दिशाहीन व महागाई वाढवणाऱ्या या अर्थसंकल्पातून देशापुढील भविष्यातील प्रश्न अधिक बिकट होतील असे दिसत आहे . आगामी पाचवर्षात ‘पाच ट्रेलियन डोल्लर्स इकॉनॉमी’ या हेडलाईन व्यवस्थापना पलीकडे या अर्थसंकल्पात काहीही नाही. गेल्या पाच वर्षात ‘ सूट बूट कि सरकार ‘ राहिलेल्या मोदी सरकारमुळे देशापुढे आर्थिक मंदीचे संकट उभे ठाकले आहे. कोट्यावधी नव्या रोजगाराची निर्मिती ,शेतीमालाला योग्य हमी भाव , देशी आणि परदेशी गुंतवणुकीत वाढ , छोट्या व मध्यम उद्योगांना अर्थसाह्य , मध्यमवर्गीयांना दिलासा , लष्कराचे अधुनिकीकरण , सार्वजनिक बँकांनकढील बुडीत कर्जांची वसुली. अशा कोणत्याच बाबतीत कोणताही ठोस कार्यक्रम व त्यासाठी तरतूद या अर्थसंकल्पात नाही उलट इंधनावरील सेस व अबकारी कर वाढवून पेट्रोल – डीझेल दर वाढून जनतेवर आर्थिक बोझा टाकला आहे . आगामी काळ जनतेच्या दृष्टीने मोठा अडचणीचा ठरणार आहे. हेच या अर्थसंकल्पातून दिसून येते. केवळ घोषणा आणि केवळ प्रचार हेच धोरण असणाऱ्या मोदी सरकारची अकार्यशमता या अर्थसंकल्पातून जनतेसमोर येत आहे.
– मोहन जोशी
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी