पुणे-गेल्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुघलकी निर्णय घेऊन या देशातील
चलनात असलेल्या ५०० व १,००० रूपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या. त्यावेळी देशाच्या हितासाठी
दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी, खोट्या नोटा छापणाऱ्यांना जरब बसण्यासाठी,
व काळ्या पैशाचा नाश करण्यासाठी ही नोटबंदी करत असल्याचे त्यांनी तेव्हा सांगितले परंतु असे काहीही न
घडता हा निर्णय पूर्णपणे चूकीचा ठरला. यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळित झाली आहे. या उलट
या देशामध्ये बँकासमोर मोठ मोठ्या रांगा लागून सर्वसामान्य जनतेचे हाल होऊन त्यामध्ये १५० च्या वर
निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. २ वर्षांनी या देशामधील लघुउद्योजक, छोटे व्यापारी हे
देशाधडीला लागले असून कामगारांना सगळ्यात मोठा फटका या नोटबंदीमुळे बसला आहे. देशातील सर्वात
मोठा शेतकरी वर्ग या नोटबंदीमुळे आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त झाला आहे. या सर्व कारणांमुळे निषेध
व्यक्त करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बाटा चौक, कॅम्प, पुणे येथे महाराष्ट्र
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे – आंदोलन करण्यात आले.
यावेळी,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘‘८नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदीनी नोटबंदीचा
निर्णय घेतला. या निर्णयाचे दुष्परिणाम आजही देशाची जनता भोगत आहे. सन २०१४ पर्यंत मनमोहन सिंग यांचे
सरकार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रगती
केली. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होती आणि जी.डी.पी. ही वाढलेले होते. देशाचे अर्थमंत्री अरूण जेठली हे
वारंवार नोटबंदीचे समर्थन करीत आहे परंतु आजपर्यंत या नोटबंदीमुळे देशाची किती प्रगती झाली हे सांगण्यात
अपयशी ठरले. नोटबंदीच्या निर्णयाच्या ४ तास पूर्वी रिझर्व बँक बोर्डच्या बैठकीत नोटबंदी करू नये व
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे असा सल्ला दिलेला असताना देखील मोदी, जेठली व अमित शहा
यांच्या त्रिकुटाने हा निर्णय सर्वसामान्य भारतीयांवर लादला.
जनतेची दिशाभुल करण्यासाठी मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा केल्या. या
कल्याणकारी योजनांसाठी आर्थिक तरतुद केलेली नाही. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन या योजनांच्या घोषणा
करण्यात आल्या. या योजनांसाठी रिझर्व बँकेकडून साडे तीन लाख कोटी रूपये घेण्याचे प्रयत्न मोदी सरकार
करीत आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पैसे देण्याच्या संदंर्भात आपली असमर्थता दाखविली
आहे. मोदी सरकार रिझर्व बँकेची सायत्ता संपविण्याचे प्रयत्न करीत आहे. अशा पध्दतीने सरकार रिझर्व बँकेचा
अधिकार काढून आपल्या फायद्यासाठी सर्व अधिकार आपल्याकडे ओढून घेत आहे.
रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सुध्दा सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या विषयावर
टिका केली आहे. असे असताना सुध्दा मोदी सरकार देशाच्या जनतेला चूकीची माहिती देत आहे. येणाऱ्या
आगामी निवडणुकीत जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.’’
यानंतर शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘नोटबंदीमुळे समाजाच्या प्रत्येक घटकाला फटका बसला
आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, बाजारात मंदी आहे. दैनंदिन मजूरी करून आपले पोट भरणाऱ्या मजूराला
काम नाही आणि मोदी सरकार अच्छे दिन आले म्हणून दिंडोरी पिटवित आहे. अशा या हिटलरशाही सरकारला
जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, कमल व्यवहारे,
ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, आबा बागुल, नीता रजपूत, रशिद शेख, शिवाजी केदारी, सदानंद शेट्टी,
गोपाळ तिवारी, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, अजित दरेकर, वैशाली मराठे, रफिक शेख,
मनीष आनंद, दत्ता बहिरट, शेखर कपोते, नरेंद्र व्यवहारे, सोनाली मारणे, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, सतिश
पवार, प्रविण करपे, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, सुरेखा खंडागळे, द.स.पोळेकर, चेतन आगरवाल, बंडू
नलावडे, बाळासाहेब अमराळे, रवि ननावरे, प्रकाश आरणे, दिपक ओव्हाळ, रामविलास माहेश्र्वरी, संजय
खडसे, अविनाश अडसुळ, प्रशांत वेलणकर, राहुल तायडे, नदिम मुजावर, चैतन्य पुरंदरे, साहिल राऊत, देवीदास
मगर, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, प्रशांत सुरसे, सुनिल पंडित, रवि पाटोळे, सेल्वराज ॲथोनी, बाबा शेख, प्रकाश
पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.