पुणे– आपल्या मुलांच्या कर्तुत्वाने ,पालकांची आणि विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाने शिक्षकांची ओळख होते असे प्रतिपादन येथे प्रा फुलचंद चाटे यांनी केले . प्रत्येक मुलात,विद्यार्थ्यात गुणवत्ता ,बुद्धीमत्ता असते ती विकसित करण्याची मोठी जबाबदारी शैक्षणिक संस्थावर येवून ठेपलेली आहे असेही ते म्हणाले . 2017-18 मध्ये दहावी बारावी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात सन्मान सोहळा प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाटे समुहाचे चेअरमन प्रा. गोपीचंद चाटे तसेच संचालक प्रा. फुलचंद चाटे, पुणे विभागाचे विजय बोबडे व प्रा. बापू काटकर यासह खुप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते, प्रत्यक्षात चाटे सर यांचे हे भाषण पहा आणि ऐका ….