मोदींच्या आर्थिक धोरणाने च देशाचा विकास – नितीन गडकरी
पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नवे आर्थिक धोरण स्वीकारले असून, त्याचा देशाच्या विकासाला निश्चितच उपयोग होणार आहे. आम्हांला व्होट बँकेचे राजकारण करायचे नाही असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मॉडर्न कॉलेजच्या प्रागंणात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. उमेदवार गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार विजय काळे, माजी खासदार प्रदीप रावत, शिवसेनेचे प्रशांत बधे, अजय भोसले, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, सिद्धार्थ शिरोळे, स्वाती लोखंडे, आदित्य माळवे, राजश्री काळे, सोनाली लांडगे, सतीश बहिरट यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री गडकरी यांनी तीस मिनिटांच्या भाषणात गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात म्हणजेच सुमारे ६० वर्षें कॉंग‘ेसने राज्य केले परंतु अपेक्षित प्रमाणात देशाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. सरकारने विविध विकासकामांसाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले त्यामागे राष्ट्रवादाचा विचार आहे. सुशासन व विकास हा राष्ट्रवादाचा मूळ गाभा आहे. त्या दृष्टीने सरकारने वाटचाला केली आहे. या सर्व गोष्टींमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे चिंतन आहे. असे ते म्हणाले.
देशामध्ये पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला असता तर शेतकर्यांच्या आत्महत्या नक्कीच थांबल्या असत्या असे नमूद करून ते म्हणाले, ‘कॉंग‘ेस आघाडीच्या काळात अनेक सिंचन प्रकल्प सुरू होऊन बंद पडले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अनेक बंद पडलेले प्रकल्प सुरू केल्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. हे प्रकल्प साधारणपणे दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण होतील. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात साडेतीन लाख हेक्टर पेक्षा अधिक वाढ होण्यास चालना मिळणार आहे.’
पुण्यामध्ये ब‘ॉडगेज मेट्रो प्रकल्प करण्याचा प्रयत्न असून या मार्गावर धावणारी मेट्रो पूर्णपणे वातानुकुलित असून तिचा वेगही चांगला असणार आहे. असे त्यांनी नमूद केले. देशाच्या विकासासाठी आर्थिक धोरण स्वीकारणारे सरकार जनतेने पुन्हा सत्तेत आणले पाहिजे यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन गडकरी यांनी केले.
पुणे शहराचे अनेकविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री गडकरी यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच शहराचा कायापालट होण्यास निश्चितच मदत होईल. गेल्या काही वर्षांत नवीन राष्ट्रीय महामार्ग, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो असे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत ते केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे त्यामुळे देशाचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक आहे. विकासाच्या कामांसाठी महायुतीला निवडून द्या असे आवाहन गिरीश बापट यांनी केले.