पुणे- राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि विपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी इ बस घोटाळ्याचे केलेले आरोप आज येथे तत्क्षणी भाजपने खोडून काढले आहेत . सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी , इ बसेस हा एक चांगला प्रकल्प पुण्यातून २६ जाने. पासून सुरु होत असताना, नुकतेच विरोधी पक्षनेते पद हातातून जात असलेल्या चेतन तुपे यांनी केलेले घोटाळ्याचे आरोप हे राजकीय नैराश्यातून केल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय ,आणि शहरात होत असलेले अनेक चांगले प्रकल्प भाजपची सत्ता होत असताना होत आहेत यामुळे तुपे पाटलांना राजकीय नैराश्य आल्याने ते टीका करत असल्याचे भिमाले यांनी म्हटले आहे.
तर पीएमपीएमएल चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी ,बेंगलोर येथील आणि पुण्यातील इ बस सेवा देणारी कंपनी एकाच असून प्रती किलोमीटर दर वेगवेगळे असल्याचे मान्य केले आहे. मात्र या मागचा अभ्यास चेतन पाटलांनी केलेला नाही असे ते म्हणाले . जेव्हा बेंगलोर मध्ये या बसेस घेण्यात आल्या तेव्हा केंद्राकी प्रती बस सबसिडी 1 कोटी १० लाख एवढी होती . आता ती उपलब्ध नाही . असे असताना आपण पुणे -पिंपरीसाठी इ बसेस घेतो आहे . आणि दोन्ही महापालिका ५० लाखाची सबसिडी आपल्या स्व माध्यमातून प्रती बस देणार आहेत .त्यामुळे या बसेस आपल्याला प्रती किलोमीटर ४० रुपये दराने मिळणार आहेत . असे शिरोळे यांनी स्पष्ट केले .
तुपे पाटलांच्या आरोपाला उत्तरे देताना ते पुढे म्हणाले ,राष्ट्रवादीनेच चोऱ्या केल्या , 5 वर्षा पूर्वी त्यांनी ४० लख रुपये किंमत असलेल्या सीएनजी बसेस ५३ रुपये किलोमीटर दराने घेतल्या , ज्या वातानुकुलीत नाहीत आणि आम्ही आता इ बसेस ज्या सव्वा कोटीच्या आहेत .त्या सबसिडी देऊन ७५ लाखाच्या घरत किमती ला जातील ,त्या ४० रुपये प्रतिकिमी दराने घेतो आहोत शिवाय या बसेस वातानुकुलीत असतील . आता पाटील यांनीच सांगावे कि भ्रष्टाचार झाला तरी कुठे ?