पुणे- मुलगी शिकली, प्रगती झाली… नुसतं म्हणायचं नाही, तर मुलींसाठी काहीतरी करायचंच…या भावनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यकशा अश्विनी आणि त्यांचे पती नितीन कदम या दाम्पत्याने गरीब घरातील ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व स्वीकारले . अजित पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी घेतलेल्या एवढ्या मोठ्या जबाबदारीची प्रशंसा यावेळी ‘सकाळ’ चे संपादक ,ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी केली .
मुलींना सक्षम आयुष्य जगण्याच्या त्यांचा अधिकारापासून वंचित न राहण्याच्या प्रामाणिक उद्देशाने हे व्रत हाती घेऊन त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करता आलेच पाहिजे व त्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी,पोस्टरबाजी टाळून पर्वती मतदारसंघातील ६० गरीब कुटुंबातील मुलींना दत्तक घेऊन त्यांची संपूर्ण शैक्षणिक फी, शालेय साहित्य, शालेय गणवेश, वार्षिक बस पास असा सर्व शैक्षणिक खर्च हे कदम दाम्पत्य करणार आहे. तळजाई परिसरातील १५ मुली व दत्तवाडीपरिसरातील ११ मुलींचा समावेश करत या उपक्रमाची सुरुवात केली.